अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सहा दिवसापासून सुरु होते.
दरम्यान, आज सातव्या दिवशी बच्चूभाऊ यांनी सरकारणे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे.
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
आपण आंदोलन स्थगित केले आहे थांबवलेले नाही असे म्हणत २ ऑक्टोबर
पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे.
“आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केलं आहे.
दिव्यांगांच्या बाबतीत आपण २५ मागण्या केल्या होत्या त्यापैकी २० मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे
आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे. आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत.
आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी
अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंतीदिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू,” अशा इशारा देत बच्चू कडू यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
संत तुकडोजी महाराजांची भूमी असलेल्या मोझरी येथे प्रहारचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु होते.
आज सातव्या दिवशी शनिवारी पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालवली होती.
बच्चू कडू यांची ढासळलेली प्रकृती पाहून एक कार्यकर्ता तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आत्मदहन करेन.
कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे कडू यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान, त्यांच्या आंदोलन स्थळी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, आजच्या घडीला शेतीचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचा आहे.
आज पुण्यात राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत सांगितले.
आपल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आपल्या आंदोलनाला हे मोठे यश आहे.
आता आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असून जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर २ आँक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
राज्यात उद्या प्रहार पक्षाचे होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशा सूचना यावेळी बच्चू कडू यांनी केल्या.
व त्यानंतर दोन अपंग यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सामंत यांच्या
उपस्थितीत बच्चू कडू यांनी पाणी घेऊन आपले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasalayamue-three-mahinancha-ration-minar/