ठाणे: धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले.
इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले. मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघे साहेबांची कुठे कुठे प्रॉप्रटीवर आहे, असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे यांच्या प्रॉपर्टीवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, दिघेंचे जिल्हाध्यक्षपद काढले तर ठाणे जिल्ह्यात पक्षच उरणार नाही, असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा थांबले.
Related News
शिवसेनेच्या उपाध्यक्ष आणि विधानसभेतील महिला आमदार नीलम गोऱ्हे यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये सांगितले होत...
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
मुंबई, महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आतल्या राजकीय वातावरणात तणाव वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत. खासदारांच्या नाराजीमु...
Continue reading
अकोल्यात धक्का ! उबाठाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि चार नगरसेवक – सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे – यांनी Eknath Shinde यांच...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या निसर्गोपचार केंद्रावर खोचक टोला; मानसोपचार केंद्रावर टीका
उद्धव ठाकरें यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर...
Continue reading
शरद पवार राज्यसभा निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णायक पाऊल आणि काँग्रेसची राजकीय अट, अजित-पवार गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा, उद्धव ठाक...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला अस...
Continue reading
“Immediate Action Needed Against Junk Food” : भारतात वाढती आरोग्यविषयक समस्या आणि खर्च
“Immediate Action Needed Agains...
Continue reading
KDMC Mayor Election 2026: कल्याण-दोंबिवली महापालिकेत राजकीय भूचकंप!
KDMC Mayor Election 2026 मध्ये शहरातील राजकारणात भूचकंप! गायब नगरसेवक, राज–शिंदे संमिलन, आणि उद्धव ठाकरे यांना ...
Continue reading
पराभवानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमध्ये बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये
Continue reading
महापालिका निकालांनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; भाजपचा डाव यशस्वी, ठाकरे गटाला खिंडार
राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ, भाजप सर्वात मोठा पक्ष
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या
Continue reading
उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंचे नाव सुचवले म्हणून दिघेंना त्रास देण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांनी मला आयुष्यात उभे केले. तुला समाजासाठी काम करायचेय हे दिघेंचे शब्द आजही कानात घुमतात. धर्मवीर सिनेमात यासंदर्भात राजन विचारे यांनी राजीनामा देऊ केल्याचा दाखवलेला प्रसंग काल्पनिक आहे.
प्रत्यक्षात त्यावेळी राजन विचारे राजीनामा देण्यास तयार नव्हते. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांच्या भाषेत समजावले तेव्हा विचारे यांनी राजीनामा दिला. आता खरी वस्तुस्थिती सिनेमाच्या दुसऱ्या भागात समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, रोज सकाळी भोंगा वाजतो. दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही २०१९ मध्ये जनतेशी बेईमानी केलीत. बाळासाहेबांचे विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात.
देवेंद्र फडणवीसांनी ५० फोन केले पण तुम्ही एकही फोन उचलला नाही. उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा यातून दिसून आला. राममंदीर उद्घाटनाला जाऊ शकला नाहीत, हे तुमचे दुर्दैव आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. महायुतीकडे नेशन फर्स्ट आहे तर महाविकास आघाडीकडे कट करप्शन कमिशन आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
मी फार प्रेमळ आहे. पण ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. मी कार्यकर्ता म्हणून प्रचाराला जातो, मुख्यमंत्री म्हणून नाही. मी जिथे जातो तिथे विरोधकांचा बाजार उठून जातो, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.