अकोला – ताडोबाहून सुरू झालेल्या धम्म यात्रा समारोपीय रॅलीचे आज
अकोल्यात भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने बुद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही यात्रा ज्ञानज्योती भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असून,
Related News
Gold Price Crash : 3,857 डॉलरची लेव्हल तुटली तर सोनं थेट इथपर्यंत घसरणार; WGC चा दावा
स्वयंपाकघरात झुरळांनी मांडलाय उच्छाद? हे 5 घरगुती उपाय करतील कमाल
‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने, चप्पल मारो आंदोलनाने खळबळ
CJP च्या बैठकीपूर्वी अभिजीत दिपके यांचे मोठे वक्तव्य; राजकारणावर स्पष्ट भूमिका
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! नितीन गडकरींवरील डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश
आरबीआयचा मोठा दिलासा; रेपो दर 5.25% वर कायम, EMI मध्ये बदल नाही
१३ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पोहोचणार आहे.
यात्रेत सुमारे ४०० लोक सहभागी असून, मार्गातील प्रत्येक गावातून मोठ्या
संख्येने अनुयायी या यात्रेशी जोडले जात आहेत.
यात्रेच्या दरम्यान बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी अकोल्यात विविध ठिकाणी बुद्धवंदना,
घोषयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बौद्ध धम्माचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
घेऊन ही यात्रा महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहे.

