अकोला, प्रतिनिधी |
अकोला ते दर्यापूर या मार्गावर दररोज खासगी वाहने प्रवासी वाहतूक करत असून,
या प्रवासामध्ये सुरक्षेचा गंभीर अभाव दिसून येतोय. प्रवाशांसह जड पोत्यांचे लोडिंग,
Related News
हिवरखेड परिसरात वृक्षारोपण; पत्रकार संघटनेकडून पर्यावरण पूजन
३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
झिजलेले टायर्स, खराब ब्रेक सिस्टिम आणि बंद न होणारे दरवाजे अशा धोकादायक स्थितीत ही वाहने रस्त्यावर धावत आहेत.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनांमध्ये ५० ते ६० किलो वजनाची पोती प्रवाशांसोबत भरली जातात.
काही वाहनांच्या टायरची अवस्था इतकी खराब आहे की, ते कधीही फुटून मोठा अपघात घडवू शकतात.
याशिवाय काही वाहनांचे ब्रेक व्यवस्थित काम करत नाहीत, आणि दरवाजे नीट लागत नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
प्रवाशांनी आरोप केला आहे की, हे खासगी वाहनचालक स्थानिक पोलीस आणि काही अधिकाऱ्यांना मासिक हप्ता देतात,
त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नियमांचे सर्रास उल्लंघन करूनही ही वाहने निर्भयपणे प्रवासी वाहतूक करत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “या वाहनांनी अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
RTO या अपघातांसाठी जबाबदार असेल का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अकोला ते दर्यापूर मार्गावरील खासगी वाहतुकीकडे प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन
विभागाने (RTO) गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/industry/