अकोला, प्रतिनिधी |
अकोला ते दर्यापूर या मार्गावर दररोज खासगी वाहने प्रवासी वाहतूक करत असून,
या प्रवासामध्ये सुरक्षेचा गंभीर अभाव दिसून येतोय. प्रवाशांसह जड पोत्यांचे लोडिंग,
Related News
बुलढाण्यात लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या...
Continue reading
पॅनकार्ड: १० अंकी पॅन नंबरचा अर्थ आणि महत्त्व
भारतात आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड ही एक अनिवार्य ओळखपत्र आहे. आजच्या काळात बँक खाते उघडणे, कर भरणे,...
Continue reading
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याचा वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार टीकास्त्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात
Continue reading
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का; विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर
Bigg Boss Marathi 6 सीझनमध्ये या आठवड्याचे एलिमिनेशन...
Continue reading
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
झिजलेले टायर्स, खराब ब्रेक सिस्टिम आणि बंद न होणारे दरवाजे अशा धोकादायक स्थितीत ही वाहने रस्त्यावर धावत आहेत.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनांमध्ये ५० ते ६० किलो वजनाची पोती प्रवाशांसोबत भरली जातात.
काही वाहनांच्या टायरची अवस्था इतकी खराब आहे की, ते कधीही फुटून मोठा अपघात घडवू शकतात.
याशिवाय काही वाहनांचे ब्रेक व्यवस्थित काम करत नाहीत, आणि दरवाजे नीट लागत नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
प्रवाशांनी आरोप केला आहे की, हे खासगी वाहनचालक स्थानिक पोलीस आणि काही अधिकाऱ्यांना मासिक हप्ता देतात,
त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नियमांचे सर्रास उल्लंघन करूनही ही वाहने निर्भयपणे प्रवासी वाहतूक करत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “या वाहनांनी अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
RTO या अपघातांसाठी जबाबदार असेल का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अकोला ते दर्यापूर मार्गावरील खासगी वाहतुकीकडे प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन
विभागाने (RTO) गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/industry/