अकोला ते दर्यापूर मार्गावरील प्रवास धोकादायक

अकोला ते दर्यापूर मार्गावरील प्रवास धोकादायक

अकोला, प्रतिनिधी |

अकोला ते दर्यापूर या मार्गावर दररोज खासगी वाहने प्रवासी वाहतूक करत असून,

या प्रवासामध्ये सुरक्षेचा गंभीर अभाव दिसून येतोय. प्रवाशांसह जड पोत्यांचे लोडिंग,

Related News

झिजलेले टायर्स, खराब ब्रेक सिस्टिम आणि बंद न होणारे दरवाजे अशा धोकादायक स्थितीत ही वाहने रस्त्यावर धावत आहेत.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनांमध्ये ५० ते ६० किलो वजनाची पोती प्रवाशांसोबत भरली जातात.

काही वाहनांच्या टायरची अवस्था इतकी खराब आहे की, ते कधीही फुटून मोठा अपघात घडवू शकतात.

याशिवाय काही वाहनांचे ब्रेक व्यवस्थित काम करत नाहीत, आणि दरवाजे नीट लागत नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

प्रवाशांनी आरोप केला आहे की, हे खासगी वाहनचालक स्थानिक पोलीस आणि काही अधिकाऱ्यांना मासिक हप्ता देतात,

त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नियमांचे सर्रास उल्लंघन करूनही ही वाहने निर्भयपणे प्रवासी वाहतूक करत आहेत.

या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “या वाहनांनी अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?

RTO या अपघातांसाठी जबाबदार असेल का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अकोला ते दर्यापूर मार्गावरील खासगी वाहतुकीकडे प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन

विभागाने (RTO) गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/industry/

Related News