१२ मे २०२५ | नवी दिल्ली
पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,
“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओजस्वी ओळींनी सुरुवात झाली.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
भारतीय हवाई दलाचे वायू संचालन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ही पत्रकार परिषद सुरू करताना
दिनकर यांची प्रसिद्ध कविता ‘रश्मिरथी’ यातील ओळींचा उल्लेख करत, भारताचा संदेश स्पष्ट केला – “याचना नाही आता रण होईल, जीवन जय की मरण होईल!”
त्याच वेळी त्यांनी तुलसीदास यांचेही शब्द उद्धृत करत स्पष्ट केलं की भारत
आता केवळ विनवण्या करणार नाही, तर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठराखणाऱ्या यंत्रणांना कठोर उत्तर दिलं जाईल.
लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी आपली माहिती देताना स्पष्ट केलं की, “भारताने सीमा ओलांडली नाही,
पण पाकिस्तानकडून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला अपयशी ठरवला.”
पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक शक्तिशाली व्हिडिओ दाखवण्यात आला,
ज्यामध्ये दिनकर यांची कविता पार्श्वसंगीत म्हणून वापरली गेली होती. यामुळे भारताने
केवळ सैनिकी ताकद नव्हे तर सांस्कृतिक आणि नैतिक संदेशही देण्याचं तंत्र वापरलं.
घई यांनी शेवटी म्हटलं, “हौसले बुलंद असतील तर यश तुमचे पाय धरते.”
हे विधान ऑपरेशन सिंदूरच्या यशावर शिक्कामोर्तब करत होतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/virat-kohlicha-test-cricketmadhun-retirement/