वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप
वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत
एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात
होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे
गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल
केला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे,
‘आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.
सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते.
भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी
बनवले आहे, परंतु दर आठवड्याला काही ना काही रेल्वे दुर्घटना आणि
अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं,
हे लज्जास्पद आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये
चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची
घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व
जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट
पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.
Read also: https://ajinkyabharat.com/be-careful-giving-chips-and-cold-drinks-to-children/