वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप
वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत
एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात
होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे
गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल
केला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे,
‘आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.
सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते.
भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी
बनवले आहे, परंतु दर आठवड्याला काही ना काही रेल्वे दुर्घटना आणि
अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं,
हे लज्जास्पद आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये
चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची
घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व
जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट
पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.
Read also: https://ajinkyabharat.com/be-careful-giving-chips-and-cold-drinks-to-children/