समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.
यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती.
भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत.
औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे अबू आझमी यांना भोवले आहेे.
काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की,
“देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे.
औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता.
त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले.
यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे.
अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
यामुळे विधीमंडळामध्ये त्यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला.
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव ठेवला. यावेळी ते म्हणाले की,
अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता
असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
ही त्यांची वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे.
अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की अबू
आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला.