पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच; आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
सलमान खानचा नवा लुक व्हायरल, ‘भाईजान’च्या मिशांवर फिदा झाले फॅन्स!
PBKS vs RCB IPL Final 2025: पहिल्यांदा विजेतेपदासाठी भिडणार
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा
या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बोर्डी शेतशिवारात प्रि मान्सून कपाशीची लागवड
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/