अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदाराकडून कामाला अपेक्षित वेग दिला जात नसल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मुरूम व गिट्टी टाकून ठेवण्यात आली असून त्यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही जणांना कायमचे अपंगत्व आल्याचीही माहिती नागरिकांनी दिली.
सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना याच मार्गाने शेतात ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावरील खडी-मुरूमामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहने अडकत आहेत. तसेच गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या पशुपालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून काही जनावरांच्या पायांना गिट्टी लागून जखमा झाल्या आहेत.
Related News
NEET Paper Leak : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा की नवा वाद? मोदींच्या फास्ट ट्रॅक निर्णयावर प्रियंका गांधींचं थेट उत्तर
Gold Rate Today : सोन्याने पुन्हा घेतली भरारी! चांदीही महागली, आज 1 तोळा सोन्याचा भाव किती?
Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदला कुठे कडकडीत तर कुठे संमिश्र प्रतिसाद; अनेक कार्यकर्ते ताब्यात
CJP Protest : ‘धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल’; नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर CJPची थेट पोस्ट
Sameer Choughule : ‘मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर समाज दुर्धर आजारी’; समीर चौघुलेंचा संताप
CJP Protest : ‘जंतरमंतरवरच यावं लागेल, त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही’; आशुतोष रांका आक्रमक
Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके तब्बल 1 लाखांना विकले? ईडीच्या आरोपपत्रातून भोंदूबाबाचे धक्कादायक कारनामे उघड
Mumbai Protest : पोलिसांनी आंदोलकांना वॅनमध्ये भरलं, एकाने गेट उघडलं अन् सगळे उतरले; VIDEO व्हायरल
Maharashtra Bandh : दिल्लीतील लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; प्रकाश आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
Maharashtra Rains : महाराष्ट्रात धो-धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी
CJP Protest : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
Rahul Gandhi : ‘मुलींना मारलं, अंगावर छर्रे लागले’; दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
हा मार्ग सध्या ‘मृत्यूचा महामार्ग’ बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
