बुलढाणा : महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मित्रपक्षाला योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच भाजपला सत्तेत येण्याची आणि सलग दुसऱ्यांदा सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली. मात्र, सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेच्या आमदारांना आणि नेत्यांना अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या भीतीचाही उल्लेख केला. भाजप शिवसेनेला संपवेल, अशी भीती सत्तार यांनी व्यक्त केली होती आणि आजची परिस्थिती पाहता त्यात तथ्य असल्याचे वाटत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले.
Related News
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावर मोदी सरकारला दिलासा? पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपसाठी सकारात्मक संकेत
संसदेच्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी...
Continue reading
रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरात मोठी राजकीय हालचाल; बावनकुळे-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या वेगव...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या उपो...
Continue reading
आधी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांना वेग; पडद्यामागे नेमकं काय सुरू?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
जयंत पाटील काय निर्णय घेतील, लवकरच कळेल; शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
जयंत पाटील काय न...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना: महापौरांना उच्च न्यायालयाची फटकार, ‘तक्रार करायची असेल तर समितीकडे करा’; 5 ऑगस्टला पुढील सुनावणी
छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन
Continue reading
महायुती सरकारच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतरही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अद्याप अर्थ खाते आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्तेतील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित केले.
आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भातही गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे काही वरिष्ठ नेते विधानसभा अधिवेशनात आपल्या लक्षवेधी सूचना मांडू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मित्रपक्ष असूनही भाजपकडून अन्याय होत असल्याची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली.
दरम्यान, महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असतानाच गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/amol-mitkars-displeasure-with-the-great-help-of-lahan-bhau-is-aslo-tari-price-havi-arthakhaatyavarun/