बुलढाणा : महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मित्रपक्षाला योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच भाजपला सत्तेत येण्याची आणि सलग दुसऱ्यांदा सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली. मात्र, सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेच्या आमदारांना आणि नेत्यांना अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या भीतीचाही उल्लेख केला. भाजप शिवसेनेला संपवेल, अशी भीती सत्तार यांनी व्यक्त केली होती आणि आजची परिस्थिती पाहता त्यात तथ्य असल्याचे वाटत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले.
Related News
नवी मुंबईत धक्कादायक गोंधळ! राष्ट्रवादीच्या आंदोलनात नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात; रोहिणी खडसे ‘उचलून’ नेल्याने खळबळ
नवी मुंबईत आज शरद पवार यांच्या र...
Continue reading
शिंदे गटासाठी कसोटीचा काळ : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखत असताना महायुत...
Continue reading
नवरात्रीत पंकजा मुंडेंचा मोठा संकल्प जाहीर होणार; गोपीनाथ गडावर भावनिक वातावरण
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नेत्या
Continue reading
शिवसेना विलिनीकरणाबाबत अब्दुल सत्तार यांचे 7 धक्कादायक संकेत; अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंच घेणार
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना विल...
Continue reading
NCP Andolan : महागाईविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; नवी मुंबईत आंदोलन तापलं, रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये...
Continue reading
भाजपविरोधात शिंदेसेनेतील नाराजी पुन्हा उफाळली; नरेंद्र बोंडेकरांचा घणाघात, महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर
महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आह...
Continue reading
TMCमध्ये ‘एकनाथ शिंदे पॅटर्न’ची चर्चा; 60 आमदार बैठकीला गैरहजर, ममता बॅनर्जींसमोर मोठे राजकीय संकट? पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ ह...
Continue reading
विधानपरिषद निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; सूचकाच्या दाव्याने काँग्रेसची वाढली अडचण, आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होणार?विधानपरिषद स्थानिक स्वर...
Continue reading
NEET पेपरफुटीवर मुंबईत काँग्रेसचा प्रचंड एल्गार
NEET पेपरफुटीविरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार; युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
...
Continue reading
मोठा दिलासा! 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटींची कर्जमाफी; फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार...
Continue reading
लाडकी बहीण योजनेत 81 लाख महिला अपात्र; 14 हजार पुरुषांकडून पैशांची वसुली, फडणवीसांची मोठी घोषणाराज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी...
Continue reading
महायुती सरकारच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतरही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अद्याप अर्थ खाते आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्तेतील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित केले.
आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भातही गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे काही वरिष्ठ नेते विधानसभा अधिवेशनात आपल्या लक्षवेधी सूचना मांडू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मित्रपक्ष असूनही भाजपकडून अन्याय होत असल्याची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली.
दरम्यान, महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असतानाच गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/amol-mitkars-displeasure-with-the-great-help-of-lahan-bhau-is-aslo-tari-price-havi-arthakhaatyavarun/