एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली
आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक
लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
संभाजीनगरमधून लढणार आहेत. इम्तियाज जलील म्हणाले,
नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये
रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम
खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी
मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते
आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची
इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात
जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर
काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीम आम्हाला
म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत.
आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला
संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु?
आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं
निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.
काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव
चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड लोकसभेतून दिमाखदार
विजय मिळवला होता. अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते
भाजपसोबत असल्यामुळे नांदेडमध्ये झालेल्या भाजपचा पराभव
महाराष्ट्रभर चर्चेला गेला. दरम्यान, मोठा विजय मिळवल्यानंतर
खासदार वसंत चव्हाण यांचे तीन महिन्यानंतर निधन झाले. त्यामुळे
नांदेडमध्ये पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र
विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेडच्या लोकसभा
निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.