आशिया-पॅसिफिक देशांमध्ये सायबर क्राईमचा धोका

सायबर क्राईमचा धोका सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचे

स्थान दुसऱ्या स्थानी आहे. डिजिटल व्यवहारांमुळे भारताला

नजीकच्या काळात सायबर क्राईमचे आव्हान असणार आहे.

Related News

रॅन्समवेअर या व्हायरसमुळे संवेदनशील माहिती आणि वैयक्तिक

डाटा लिक केला जातो. अशा प्रकारच्या सायबर क्राईमच्या

घटनांमध्ये जगात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॅन्समवेअर

व्हायरसच्या हल्ल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फायली उपलब्ध

होत नाहीत. संपूर्ण यंत्रणा आणि नेटवर्क ठप्प होते. यंत्रणा

सुरळीत करण्यासाठी सायबर क्राईमचे गुन्हेगार संबंधित

व्यवस्थेकडे पैशाची मागणी करतात. सायबर क्राईममध्ये

गुन्ह्यासाठी विविध प्रकारच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात

येतो. यामध्ये फिशिंग, रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉलसह अन्य

मार्गाने सॉफ्टवेअरमध्ये व्हायरसद्वारे बिघाड निर्माण केला जातो.

डार्क एंजल्स या रॅन्समवेअर व्हायरसी निगडित कंपनीने आतापर्यंत

सर्वाधिक ७५ दशलक्ष डॉलर्सवर रक्कम उकळली आहे. या

कंपनीच्या कारनाम्यामुळे जगातील सायबर क्राईमच्या धोका

आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. युरोप, आफ्रिका

आणि भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑनलाईन

व्यवहारात वाढ झाली आहे. आशिया-पॅसिफिक देशांमध्ये १.३

अब्जांवरील व्यवहार डिजिटलद्वारे होत आहेत. उत्पादन क्षेत्र,

आरोग्य, तंत्रज्ञान, वित्तीय सेवा ठिकाणी रॅन्समवेअर व्हायरसच्या

घटना सर्वाधिक होत आहे. याचे प्रमाण २९ टक्के आहे. लॉक

बिट, बियानलियान, ब्लॅक कॅट, मलॉक्स आदी रॅन्समवेअर

फॅमिलीकडून सायबर क्राईमचा धोका वाढत आहे.

Read also:https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhaji-rajes-swaraj-party-in-the-state-all-are-awake/

Related News