मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी
औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास
करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर
यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न
घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी
नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली हा
दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा, मुक्तीचा दिवस
असल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र
प्रवर्तन दिनानिमित्त 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान
दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि
महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन
दिन साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. महाराष्ट्र आणि
देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत
असतात. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की,
आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द
अनुयायांकडून आकारण्यात येणारा टोल माफ करावा, असे या
पत्रात म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ratan-tata-became-his-heir/