आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची
महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या
शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा
Related News
अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या
माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा
मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू
होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध
करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस
आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजची पत्रकार परिषद राजकीय नाही. राज्यात जे अराजक
माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी
सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर
आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती.
या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं
आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं
ऑडिओ आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/katepurna-prakalpatoon-22-49-d-l-g-m-water-immersion-in-one-month/
