सध्या मराठी रंगभूमीवर सादर होणारे नाटक ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वावर आणि त्याच्या इतिहासावर थेट भाष्य करत आहे. या नाटकात मराठी माणसाला मिळणारी किंमत, त्याचे संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्थेद्वारे सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे.
नाटकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घडलेल्या विविध घटनांचा आढावा घेऊन त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेची कथा प्रेक्षकांसमोर आणली जाते. नाटक पाहताना प्रेक्षकांना पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो तसेच मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांच्या कथा डोळे पाणावून टाकतात. याचसोबत आजच्या मुंबईतील मराठी माणसाच्या स्थानाची खरी वास्तविकता प्रेक्षकांसमोर येते.
गावागावातून मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या कष्टावर उभी राहिलेली ही नगरी आज बदलत चालली आहे. गिरगाव, लालबाग, परळ, दादर यांसारख्या मराठी वस्तींच्या भागात आज मराठी माणूस किती उरलाय, हा सवाल नाटकातून विचार करायला भाग पाडतो. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम आवाज देणाऱ्या मराठी जनतेच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीवर नाटक प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
Related News
178 प्रयोगांनंतर मोठा निर्णय! लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'कुटुंब किर्रतन' का सोडलं? तन्वी मुंडलेचा धक्कादायक खुलासामराठी रंगभूमी आणि छोट्...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
स्मशानभूमीत उलगडलेलं जीवनतत्त्वज्ञान: आयुष भिडेचा ‘घोर’ दीर्घांक प्रेक्षकांना विचार करायला लावणारा प्रयोग
मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या म...
Continue reading
5 मोठे निर्णय! रंगभूमीसाठी शर्मिला राजाराम शिंदेने नाकारल्या मोठ्या भूमिका; कारण ऐकून व्हाल थक्कमराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार लोकप्रियत...
Continue reading
मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेलं नाटक “चिरंजीव परफेक्ट बिघडलाय” केवळ आपल्या कथानकामुळेच नाही, तर रंगमंचामागच्या रोमांचक आणि अनपेक्षित घटनांमुळेही चर्च...
Continue reading
जगातील पहिली ग्लोबल दिंडी ठरणार ऐतिहासिक
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आषाढी वारी आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. दरवर्षी लाखो व...
Continue reading
सगळे प्रेक्षक बसले आहेत ना?' सतीश राजवाडेंच्या एका प्रश्नाने जिंकली रसिकांची मने
नाटक रंगात असतानाच सतीश राजवाडेंनी थांबवला प्रयोग; चिंचवडमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना
पुणे : मराठी...
Continue reading
सागर कारंडेचा दमदार कमबॅक; ‘शिक्कामोर्तब’ नाटकातून रंगभूमीवर पुन्हा एकदा विनोद आणि भावनांचा महासंगम!
मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अचूक विनोदी टाय...
Continue reading
जगभरात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त यंदा मराठी मनोरंजन विश्वाने विशेष छाप सोडली. फ्रान्समध्ये पार पडणाऱ्या य...
Continue reading
अशोक सराफ-निवेदिता सराफ यांनी गाजवलं ‘कान्स’चं रेड कार्पेट; मराठी संस्कृतीचा जागतिक मंचावर दिमाख
भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते Ashok...
Continue reading
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबईत उत्साहात संपन्न झाला. हा कार्य...
Continue reading
विशेष म्हणजे, नाटकात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून सादर केलेले दृश्य नाटकाला नवा आयाम देतात, ज्यामुळे प्रेक्षकांना नाट्यचित्र माध्यमाचा अनोखा अनुभव मिळतो. या नाट्यकृतीला आदेश बांदेकर आणि उदय सबनीस यांचं निवेदन आहे.
नाटकाच्या संगीतासाठी रोहन पाटील, प्रकाशयोजनासाठी राजेश शिंदे, AI चित्रफितीसाठी प्रसाद सोनावणे आणि हर्ष राऊत, गायनासाठी मनोहर गोलांबरे आणि रविंद्र खोमणे, तसेच अभिनयासाठी गणेश जाधव आणि संदिप जंगम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या नाटकाची निर्मिती महेश भोसले आणि संदिप जंगम यांनी केली आहे.
नाटक मराठी माणसाच्या इतिहासावर, आजच्या स्थितीवर आणि मुंबईतील मराठी अस्मितेच्या टिकावावर प्रभावीपणे प्रकाश टाकते. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी प्रेक्षक यावर विचार करायला भाग पडतो, तसेच त्याच्या अस्तित्वावर आणि हक्कावर सवाल उपस्थित होतो.
read also : https://ajinkyabharat.com/rajmata-jijau-bus-service-started-in-the-state-3000-smart-buses-will-soon-run-on-mumbai-pune-nagpur-route/