नागपूर, दि. 26 फेब्रुवारी 2026: महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात महावितरणने केलेली उत्कृष्ट कामगिरी राष्ट्रीय स्तरावर गौरवली गेली आहे. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये बुधवारी (25 फेब्रुवारी) आयोजित कार्यक्रमात महावितरणला ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 92.7 बिग एफएम या लोकप्रिय रेडिओ चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम व समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात येत असतो.
या समारंभात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार तसेच जेष्ठ अभिनेते बोम्मण ईराणी यांची उपस्थिती कार्यक्रमात विशेष ठरली. याशिवाय सिनेसृष्टी, सामाजिक, राजकीय, उद्योग, कला क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
महावितरणने राज्यभरात 88.50 लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना अचूक बिल, दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर तपासण्याची सुविधा, सवलतीच्या दरात उपकरणांचा वापर नियोजनाने करण्याची संधी मिळते, तसेच विजेचा वापर नियंत्रित ठेवता येतो. घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे टीओडी सवलतही मिळते. औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीत विजेचा वापर करण्यावर सवलत लागू आहे.
Related News
जपानने विकसित केलेल्या Human Fridge या अनोख्या उपकरणाची जगभर चर्चा सुरू आहे. अवघ्या 10 मिनिटांत शरीराला ...
Continue reading
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; 9 किलो वजन घटलं, डॉक्टरांचा गंभीर इशारा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणा...
Continue reading
डोणगाव : डोणगाव येथील लोणी गवळी रोडवरील बोरतलाव परिसरात चोरट्यांनी विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्याची ...
Continue reading
राम चरण आणि जान्हवी कपूर स्टारर 'पेड्डी' हा 3 तास 7 मिनिटांचा स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासांत टॉप ट्रेंडिंगमध्ये नं...
Continue reading
रितू पाठक यांची यशोगाथा ठरतेय हजारो उद्योजकांसाठी प्रेरणादायी
आजच्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते, अशी अनेकांची धारणा आहे. मात्र रांची येथील उद्योजिका ...
Continue reading
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 7 सदस्यीय स...
Continue reading
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एका कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नी, मुल...
Continue reading
विजेच्या धक्क्याने अख्खं कुटुंब संपलं, 4 जणांचा जागीच मृत्यू; साताऱ्यातील हृदयद्रावक दुर्घटनेमुळे परिसर शोकसागरात
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बुधवारी पहाटे घडलेल्या एका भीषण...
Continue reading
17 वर्षांच्या इम्रानची कमाल! अवघ्या 6 महिन्यांत 5 कोटींची AI कंपनी उभी; 10 हजार विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला
तंत्रज्ञानाच्या युगात कल्पकता, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर यश मिळ...
Continue reading
Wi-Fi Tracking Truth 2026: धक्कादायक सत्य! कॅमेऱ्याशिवाय Wi-Fi ने माणसाची हेरगिरी खरंच शक्य? जाणून घ्या 7 मोठी तथ्ये
सध्या OTT प्लॅटफॉर्मवरील 'प्रितम अँ...
Continue reading
Gaurav More : 'भूमिकेपेक्षा कुणी बोलावलं हे महत्त्वाचं'; राजकुमार हिरानींच्या वेब सीरिजमधून गौरव मोरेचं दमदार हिंदी पदार्पणमराठी अभिनेता गौरव म...
Continue reading
दुबईतील 14 वर्षीय जैनम जैनने AI स्टार्टअप उभारून बुर्ज खलिफात ऑफिस सुरू केले आहे. TEDx स्पीकर, दोन पेटंट, पुस्तक आणि लाखो सबस्क्रायबर्स असलेला हा तरुण...
Continue reading
राज्यात 9 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील नागरिकांना स्मार्ट मीटरच्या फायदे, अचूक बिलिंग, वीज बचत व सुविधांबाबत माहिती देण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आणि महावितरणच्या या नवोन्मेषात्मक उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांना अधिक सुविधा, अचूक बिलिंग, वीज बचत व जागरूकता या अनेक क्षेत्रांत लाभ देणाऱ्या महावितरणला ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्कार मिळाल्यामुळे राज्यातील वीज वितरण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/kdmc-file-theft-scandal-2-building-documents-missing/