५ जिल्हे, २९०० किमीचा थरारक पाठलाग; चार आरोपी पुण्यात अटकेत!”

चार आरोपी

मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ अत्यंत थरारक ठरले. शेलू वेताळ येथील जुन्या वादातून ११ जानेवारी २०२६ रोजी आशिष देशमुख आणि समीर जाधव यांच्यावर चार आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. मीर मुसैब हुसैन, सुजल जाधव, प्रतिक खंडारे आणि सुमित शिरेकर हे आरोपी त्वरित फरार झाले. अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून शोध मोहीम राबवली गेली. अमरावती, बडनेरा, नागपूर, ठाणे, मुंबई, कल्याण, पुणे या पाच जिल्ह्यांत तब्बल २९०० किमीचा पाठलाग करत आरोपी शोधले गेले. पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली, सीसीटीव्ही फुटेज तपासली, हॉटेल्स, लॉजेस, आश्रमशाळा आणि रेल्वे स्टेशन पिंजून काढले.

अखेरीस पुणे, चाकण परिसरात आरोपी लपून बसलेले असल्याचे निदर्शनास येताच, सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि ठाणेदार श्रीधर गुळे, पोउपनि चंदन वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अटक केलेले आरोपी हीसख्ये १९-२० वर्षे वयोगटातील आहेत. ही धाडसी आणि ठोस कारवाई ग्रामीण पोलीस दलाच्या कुशलतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/budget-2026-cigarette-price-hike-cigarette-price-of-rs-10-increased-to-rs-12-13/

Related News

Related News