अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून दावे–प्रतिदावे सुरू असून शहरातील राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. एकीकडे भाजपने बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवत 44 सदस्यांचा शहर सुधार आघाडी स्थापन केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसत असतानाच, काँग्रेसनेही जोरदार प्रतिदावा केला आहे.
काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 चा जादुई आकडा पूर्ण असल्याचा ठाम दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच अकोल्यात सत्ता स्थापन होईल आणि महापौर हा आमचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिक चुरशीचा झाला आहे. उद्याच्या महापौर निवडणुकीत कोणत्या घडामोडी घडतात, कोणाचे संख्याबळ प्रत्यक्षात सिद्ध होते आणि सत्तेची चावी कुणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अकोल्याच्या राजकारणात उद्याचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Related News
दोन दिवस जंगलात लपला, पण पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकला नाही आरोपी
Patur : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या संतापजनक प्रकरणात पोलिसांना ...
Continue reading
कल्याणमध्ये कचऱ्याचं साम्राज्य; नाल्यात उतरून क्रिकेट खेळत मनसेचं अनोखं आंदोलन
कल्याण : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कल्याण पश्चिमेती...
Continue reading
बळीराजाच्या कष्टाची क्रूर चेष्टा! 12 क्विंटल कांदा विकला, पण हातात दमडीही नाही; उलट भरावा लागला 1 रुपया
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण
Continue reading
संजय राऊत रडारवर? भाजप नेते नवनाथ बन यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेश ...
Continue reading
वाडेगाव परिसरात अन्नसुरक्षेशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानांमध्ये मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांचा मोठ्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील हर्षदा दिपकराज डोंगरे हिने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. भारत सरकारच्या...
Continue reading
साई रिसॉर्ट प्रकरणात मोठा ट्विस्ट! Anil Parab यांना दिलासा; कोर्टाने दिली निर्दोष मुक्तता
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या बहुचर्चित
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीची चाहूल लागली आहे. शिवसेनेतील दोन गटांमधील संघर्ष अजूनही संपलेला नसताना, आता नव्या घडामोडींनी प...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/fatawar-accident-on-bhatkuli-road-four-dead/