बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून
बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदुरा,
कारंजा (रम), हाता, अंदुरा, बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण, शिंगोली,
अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिजन, कवठा, बहादुरा, निंबा, वझेगाव,
मोखा, काजिखेड, परिसरात संततधार पावसामुळे
खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे
आदेश जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तिळ आदी
पिकांची नासाडी होत असून कपाशीची पाने झडत असल्याचे दिसत आहे.
याशिवाय शेतात पीक कमी व सार्वत्रिक पाणीच पाणी दिसून येत आहे.
त्यामुळे बाळापूर तालुक्यातील ९० टक्के पिके धोक्यात सापडली असून
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सध्या
हरवलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी
शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहत आहेत.
एकीकडे लालफितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा
सामना करावा लागत असून बाळापूर तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा
अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/akola-katepurna-prakalpat-42-percent-jalsatha/