नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले.
‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
Related News
डोनाल्ड ट्रम्प यांचा अब्राहम कराराद्वारे जागतिक राजकारणात मोठा डाव; 7 मुस्लिम देशांसह इराणही करणार इस्रायलशी मैत्री ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ...
Continue reading
अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड; पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेला धक्का, होर्मुझ खाडीबाबत नवा आशावाद
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
पाकिस्तानची भारताविरोधात मोठी खेळी! चीन दौऱ्यावर शहबाज शरीफ; ‘2 मोठे करार’ भारतासाठी ठरू शकतात धोकादायक?
इस्लामाबाद/बीजिंग : जागतिक राजकारणात सध्या चीन के...
Continue reading
International Tea Day : 5000 वर्षांपूर्वी चहाचा शोध नेमका कुठे आणि कसा लागला? भारतात कसा झाला ‘चहा’चा प्रवास
International Tea Day : भ...
Continue reading
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताने पाकिस्तानवर जोरदार...
Continue reading
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचं लक्ष मध्यपूर्वेकडे लागलं असताना आता या प्रकरणात एक मोठा राजनैतिक ट्विस्ट समोर आल...
Continue reading
Pakistan-US Secret Report : काश्मीरवर अमेरिकेचे समर्थन मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, पण भारताबाबत अमेरिकेची स्पष्ट भूमिका
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारल्याचे चित्र...
Continue reading
पाकिस्तानचा डबल गेम उघड? इराणच्या विमानांवरून जगभर खळबळ, अमेरिकेच्या आरोपांना पाकिस्तानचं जोरदार उत्तर
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान
Continue reading
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाला आता दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. होर्मुज खाडीपासून मध्यपूर्वेतील अनेक भागांमध्ये ...
Continue reading
चीनचे नवे स्टेल्थ फायटर J-35AE दाखल, पाकिस्तानला मिळणार? भारतासाठी काय संदेश?
चीनने आपल्या संरक्षण क्षेत्रातील आणखी एक मोठे पाऊल उचलत अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट
Continue reading
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.
समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.