नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले.
‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
Related News
श्रीलंकेचा भारताला मोठा शब्द; भारतविरोधी कारवायांसाठी श्रीलंकन भूमीचा वापर होऊ देणार नाही
India-Srilanka Relations : भारत आणि श्रीलंक...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमी...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
पाकिस्तानमध्ये मोठा दुहेरी हल्ला; २५ सैनिक ठार झाल्याचा BLAचा दावा, हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली
बलुचिस्तानमध्ये जियारत क्रॉस आणि सुराब येथे हल्ले; पाकिस्तानी सुरक्षा दलांची शस्...
Continue reading
Nepal च्या महापुरानंतर बालेन शाहांचा मोठा दावा; भारत, चीन आणि अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्याची शक्यता
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आले...
Continue reading
पाकिस्तानला ज्याची भीती तेच घडले! काश्मीरवर अमेरिकेचे मोठे विधान; भारताला मोठा राजनैतिक दिलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये काश्मीरचा मुद्द...
Continue reading
Nepal : नेपाळ-तिबेटमध्ये महाभयंकर पूर! मृतांचा आकडा ६००च्या उंबरठ्यावर; चीनकडून केवळ काही मृत्यूंची माहिती, बचावकार्याला वेग
Nepal : Nepal आणि चीनच्या ...
Continue reading
तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता; सद्गुरूंची चीनकडे मोठी मागणी, व्हिडीओमध्ये झाले भावूक
तिबेट : नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरामुळे मोठी ...
Continue reading
J-10CE : चीनने दिली फायटर जेट्स; पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारताची एकाच गोष्टीची भीती
चीन आणि पाकिस्तानमधील संरक्षण सहकार्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने नवी...
Continue reading
भारताकडे मैत्रीचा हात, पाकिस्तानसोबत संरक्षण कराराची तयारी? बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेने वाढली चिंता
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मागील काही काळ...
Continue reading
Bangladesh ने जुनी परंपरा मोडली; भारताने कडक शब्दांत सुनावलं, नेमकं काय घडलं?
भारताचा शेजारी देश Bangladesh सोबतच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणावा...
Continue reading
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.
समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.