इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल्याने अंदाजे २०० एकरांहून अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
Exclusive विठ्ठल महल्ले अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कार्यरत पोलीस अंमलदार गिरीष दशरथ खडके रा. बलोदे लेआउट, हिंगणा रोड या...
Continue reading
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात नवीन चार आरोपींना अटक; आरोपी संख्या आठवर
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, चौघांना सात दिवसांची प...
Continue reading
अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊसवर एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव ज्ञ...
Continue reading
आरोग्य विमा दावे नाकारले जाण्याची कारणे आणि त्यावर उपाय
आरोग्य विमा आजच्या काळात प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रुग्णालयीन
Continue reading
डोनाल्ड ट्रम्पचा दिग्गज प्रशंसा लेख — "असिम मुनीर, शेहबाज शरिफ महान लोक"; पाकिस्तान-अफगाण युद्ध लवकरच सुटवेन — ट्वीक आणि आंतरराष्ट्रीय मागोवा
अमेरि...
Continue reading
Indoreचा कलंक : ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना त्रास देणारा आरोपी निघाला सिरीयल ऑफेंडर
इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर शहर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आ...
Continue reading
अकोला शहरात निर्घृण हत्या: अक्षय नागलकर प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक
अकोला, डाबकी रोड पोलीस ठाण्याचे हद्दीत भयावह प्रकरण: हत्या ही घटना अकोला शहर...
Continue reading
मोठा निर्णय! Bangladeshi Illegal Immigrants आता राज्यात आळा बसणार
राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये भव्य अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगरपालिकेच्या गोयनका नगर परिसरातील गजानन महाराज वाटिका सभागृहामध्ये भव्य अध्यात्मिक बाल
Continue reading
'एक दीवाने की दीवानियत' : ९०च्या दशकातील ‘टॉक्सिक लव्ह’ची पुनरावृत्ती?
मुंबई – अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांचा नवा चित्रपट एक दीवाने की दीवानियत नुकताच प...
Continue reading
जोगेश्वरीतील उंच इमारतीत भीषण आग! JNS बिझनेस सेंटर धगधगले; लोक टॉप फ्लोअरवर अडकले, बचावमोहीम सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा भीषण आग; सकाळी १०:५० वाजता लागली आग, सुदैवान...
Continue reading
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या आधारावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
मात्र नंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे काही शेतांतील बियाणे वाहून गेले, काही सडले, तर काही जमिनीखाली दबले.
परिणामी बियाण्याचा उगमच झाला नाही.
बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
बियाण्याची मागणी अचानक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काहींनी बियाणे मिळवून दुबार पेरणीस सुरुवात देखील केली आहे.
कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही
दुबार पेरणीची परिस्थिती गंभीर असतानाही कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
त्यामुळे ही माहिती अद्याप प्रशासनाच्या नोंदीत नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे
“माझ्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, पण २६ आणि २७ जुन रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही.
त्यामुळे पुन्हा बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी करत आहे. प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करणे आवश्यक आहे.”
— रवी काळेकर, शेतकरी, इंझोरी
“यंदा पावसाला विलंब झाला. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून अल्पशा पावसावरच पेरणी केली.
मात्र नंतर आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बियाणे उगवलेच नाही. आता दुबार पेरणी करावी लागत आहे.
याची तक्रार लवकरच कृषी विभागाकडे करणार आहे.”
— अशोक इंगोले, शेतकरी, इंझोरी
तत्काळ पाहणी आणि मदतीची गरज
स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की,
लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.
अन्यथा शेतकरी अधिक अडचणीत सापडतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/every-person-in-your-name-shindencha-sher-aani-jai-gujarat-azhane-churchna-udhan/