वाशीम | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर वाशिमजवळील शेलुबाजार इंटरचेंजजवळ ३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता एक भीषण अपघात झाला.
या अपघातात उमरेड (जि. नागपूर) येथील जयस्वाल कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
Related News
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांनी गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करत मोठा गोंधळ घातला.
जुन्या शहरातील शाखेत आज सकाळपासूनच शेकडो ठेवीदारांनी आ...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
पातूर शहरातील भावना पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
गुलाबाच्या फुलांनी स्वागत, डोक्यावर रा...
Continue reading
नागपूर
नागपूरमधील लता मंगेशकर रुग्णालयात मध्य भारतातील पहिलीच यशस्वी लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
राजस्थानमधील ४० वर्षीय रुग्णाने कॅन्सरमुळे ८ वर्षांपूर्वी लिंग गमावले...
Continue reading
आकोट | प्रतिनिधी
आकोट शहरातील थकीत मालमत्तांवर आकारण्यात आलेली शास्ती शंभर टक्के माफ करून
संबंधित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा, तसेच मालमत्तांवरील कर आकारणीच...
Continue reading
अपघात इतका भीषण होता की, ईर्टिगा वाहनाचा पूर्ण चुराडा झाला.
प्राप्त माहितीनुसार, जयस्वाल कुटुंब पुण्यात कौटुंबिक कार्यक्रम आटोपून MH-40-BJ-7206 क्रमांकाच्या ईर्टिगा कारने उमरेडकडे परतत होते.
दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील चॅनल क्र. २१५ वर पलटी झाली.
यामुळे वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर राधेश्याम जयस्वाल, संगीता जयस्वाल आणि चालक चंदन हेलगे हे गंभीर जखमी झाले.
जखमींना वाशीम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान राधेश्याम आणि संगीता जयस्वाल यांचाही मृत्यू झाला.
सध्या चालक चंदन हेलगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अशी आहेत मृतांची नावे
-
वैदेही किर्ती जयस्वाल (वय २४, इतवारी पेठ, उमरेड)
-
माधुरी किर्ती जयस्वाल (वय ५२, इतवारी पेठ, उमरेड)
-
संगीता अजय जयस्वाल (वय ५२, हनुमान नगर, नागपूर)
-
राधेश्याम शिवनारायण जयस्वाल (वय ६६, इतवारी पेठ, उमरेड)
माय-लेकीच्या मृत्यूने समाजमन हेलावले
या अपघातात वैदेही आणि तिची आई माधुरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
राधेश्याम व संगीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जयस्वाल कुटुंबाच्या घरावर शोककळा पसरली असून संपूर्ण उमरेडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
चालकाची झोप ठरली अपघाताचे कारण?
चालकाला डुलकी आल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता आहे.
गाडीचा वेग अधिक होता, त्यामुळे नियंत्रण सुटल्याचेही सांगण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे पालन, चालकांची विश्रांती, आणि वाहन तपासणी या बाबींवर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या अपघाताने एक संपूर्ण कुटुंब उजाडले असून, उमरेडमध्ये शोकमय वातावरण आहे.
मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/nagpurmadhyaye-vaidyakshetra-kranti-consarma/