उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
गेल्या दोन दिवसापासून मान्सून पावसाची जोरदार हजेरी लागत आहे.
त्यातच सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे उंबर्डा बाजार वासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.
Related News
ग्रामपंचायत ने केलेल्या उपायोजना केवळ कागदावरच असल्यामुळे पाचही वार्डातील मान्सूनपूर्व नालीसफाई न केल्याने
नाली मधील गाळ रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे व दुर्गंधी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या अफलातून कारभार नेहमीच चर्चेत असतो.
सांडपाण्याची व्यवस्था करने, सफाई करणे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊन उपाययोजना करणे
असे ग्रामपंचायत प्रशासनाचे काम असते मात्र ग्रामपंचायतीने केलेली सर्व उपाययोजना कागदावरच राहिल्याने
याची पोलखोल आलेल्या पावसाने करून दिली. परिसरातीत पावसाने हजेरी लावली आहे .
यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखावला असला तरी उंबर्डा बाजार ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे
उंबर्डा बाजार मधील ग्रामस्थ चांगलेच संकटात सापडला आहे.
पावसाळ्यात आनंद घेण्याऐवजी या पाचही वार्डातील नागरिक चांगलेच कामाला लागले.
नाल्याची साफसफाई न केल्याने असा प्रकार घडला नाली मध्ये गाळ साचून तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहिले.
यामुळे नाल्यातील संपूर्ण गाळ रस्त्यावर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन दरवर्षी लाखो रुपये कर
गोळा करून सुद्धा कोणतेही काम करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात नागरिकांना चांगला त्रास सहन करावा लागत आहे.
उंबर्डा बाजार येथील भवानी मंदिर मुख्य रस्त्यावर चिखल साचल्यामुळे रस्त्याची दैयनीय अवस्था झाली आहे.
याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य वेळेत लक्ष दिले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.
साथीचे रोग डोके वर काढण्याची दाट शक्यता उंबर्डा बाजार मधील पाचही वार्डात निर्माण झाली आहे.
या बाबत नागरिकांनी उंबर्डा बाजारचे ग्रामविकास अधिकारी श्री जयकिसन आडे
यांचे सोबत भ्रमणध्वनी वरुण संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तसेच शासनाच्या विविध योजनांना ग्रामपंचायत तर्फे केराची टोपली दाखविली जात आहे.
शासनाच्या घनकचरा निर्मूलन व स्वच्छता मिशन च्या योजना कुचकामी ठरत आहे.
याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थामधून पुढे येत आहे.
परिसरात दुर्गंधीचे वातावरण
जोरदार पावसामुळे केरकचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्यातील कचरा रस्त्यावर आला त्यामुळे ५ ही वार्डा मध्ये दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार आहे.
अशी प्रतिक्रिया सर्वस्तरावरून व्यक्त होऊ लागली आहे.