अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत

अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच 'मेडे कॉल', ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत

प्रतिनिधी | अहमदाबाद

अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,

Related News

दुपारी 1:40 वाजता हा अपघात झाला. आग पूर्णपणे संध्याकाळी 6 वाजता आटोक्यात आणली गेली.

 टेकऑफनंतरच तांत्रिक बिघाड
  • विमानाने उड्डाण घेतल्यानंतर फक्त 650 फूट उंचीवर पोहोचल्यावर पायलटने ‘मेडे कॉल’ (इमर्जन्सी सिग्नल) दिला होता.

  • मात्र, त्यानंतर ATC शी संपर्क होऊ शकला नाही, आणि विमान जवळच्या हॉस्पिटलजवळ कोसळले.

 ब्लॅक बॉक्स सापडला

  • ब्लॅक बॉक्स घटनास्थळी सापडला असून, तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

  • यामध्ये फ्लाइट डाटा व कॉकपिट आवाज रेकॉर्डिंग असल्याने अपघाताची खरी कारणे समजू शकणार आहेत.

 उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत

  • केंद्र सरकारने या अपघाताच्या गंभीर चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती तयार केली आहे.

  • मंत्री नायडू म्हणाले, “हे दुर्दैवी घडलं, पण आम्ही पूर्ण पारदर्शकतेने तपास करणार.”

 आणखी एक मृतदेह सापडला

  • बी.जे. हॉस्पिटलच्या छतावर अजूनही विमानाचे काही अवशेष आहेत.

  • त्या ठिकाणाहून आणखी एक मृतदेह सापडला आहे. एकूण मृतांची संख्या 274 वर गेली आहे.

  • विमानातील फक्त एक प्रवासी जिवंत बचावला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pm-farmer-yojnechi-20th-haptachi-waiting/

Related News