दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा लवकर
येण्याची चाहूल लागली आहे. तसेच या पावसामुळे शेती मशागत करणे सोयी झाले आहे.
पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने शेतकरी मिळेल त्या
अवजारांचा उपयोग करून किंवा यंत्राच्या, ट्रॅक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी व वखरणीसाठी
शेतामध्ये लागलेले आहेत. दानापूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनीही शेतातील मशागत सुरू केली आहे.
शेती नवीन हंगामासाठी होत आहे सज्ज
दानापूर गावातील शेतकरी लोकांना उन्हाळी ज्वारी, भुईमूग, मुंग,मक्का, कांदा, पीक काढण्यात
अवकाळी पाऊस मोठ मोठी अडचण ठरला होता. या अस्मानी संकटामुळे कास्तकार हवालदिल झाला आहे.
पावसाळ्यातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागती जोरात सुरू झाली आहे. हवामान विभागाने पुढील
काही दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बी-बियाणे
आणि खतांची तयारीही सुरू झाली आहे. शेतकरी आता नव्या हंगामासाठी सज्ज होत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/duchaki-disinterested-wife/