दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
दानापूर येथील रहिवासी सुनील सुरजुसे हे पत्नी सविता सुरजुसे यांच्यासह दि. ५ जून रोजी सकाळी अकोल्याला लग्नासाठी गेले होते.
संध्याकाळी परत येत असताना माळेगाव रस्त्यावरील दानापूर शिवारात राऊत
यांच्या शेताजवळ ही दुर्दैवी घटना घडली. दुचाकीच्या मागे बसलेल्या सविता सुरजुसे यांच्या गळ्यातील
स्टोल मागील चाकात अडकला आणि त्या खाली पडल्या. डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर सुनील सुरजुसे यांनी प्रसंगावधान राखून तेल्हारा डेपोची एसटी बस थांबवून पत्नीला तातडीने बसमध्ये बसवले
आणि तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी
डॉ. प्रणय जंगडाळे यांनी सविता सुरजुसे यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून,
त्यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि लहान मुलगा असा परिवार आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/tribal-hakkansathi-scheduled-jamaati-commission-mahtwache-paul/