राज्यात मान्सून लवकर दाखल झाला असून अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
मात्र, कृषी विभागाने शेतकऱ्यांना तत्काळ पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
वापसा (जमिनीत योग्य ओल व स्थिती) येईपर्यंत थांबण्याची सूचना कृषी विभागाने स्पष्टपणे केली आहे.
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
वापसा आल्यानंतरच करा पेरणी – कृषी विभाग
राज्याच्या विविध भागात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल आली आहे.
पण ज्या भागात अति पाऊस झाला आहे, तिथे जमिनीतील ओल सरकण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
34 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यभरात जवळपास 34,000 हेक्टर क्षेत्रावरील
पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच
राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे, असं पुणे विभागाचे कृषी संचालक र. शा. नाईकवाडी यांनी सांगितलं.
पावसाच्या अलर्टसची माहिती
भारतीय हवामान विभागानुसार पुढील तीन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
-
रेड अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा (घाट परिसर)
-
ऑरेंज अलर्ट: सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग
-
येलो अलर्ट: उर्वरित महाराष्ट्र
समुद्र खवळलेला, भरतीचे स्वरूप वाढले
मुंबई व कोकण किनारपट्टी भागात अरबी समुद्र खवळलेला असून मोठ्या लाटा उसळत आहेत.
त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सारांश: शेतकऱ्यांनी घाई न करता, जमिनीचा वापसा झाल्यानंतरच पेरणी करावी.
यामुळे पिकांचं नुकसान टाळता येईल आणि उत्पादनात वाढ होईल,
असा स्पष्ट सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pandharichi-wari-chitrapatal-muktachi-bhumika-sakaranari-actress-acts-today/