नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी
खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्यात थेट फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून नेमलेले खासदारांचे हे गट विविध राष्ट्रांना भेट देऊन भारताच्या ऑपरेशन
सिंदूरमधील भूमिकेचे स्पष्टीकरण देणार आहेत. या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला असून,
शिवसेनेने या पुढाकाराचे स्वागत करत दहशतवादाविरोधातील लढ्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारला दिले आहे.
शिष्टमंडळ हा कोणत्याही राजकीय हेतूने नसून, केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केल्यानंतर,
उद्धव ठाकरे यांनी “आपण देशासाठी आवश्यक ते सहकार्य करू,” असे केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
शिवसेना (ठाकरे गट) यांची भूमिका स्पष्ट करताना असेही सांगण्यात आले की,
“देशात गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारले जातील,
पण जागतिक स्तरावर पाकिस्तानमधील दहशतवादाचे वास्तव उघड करणे, त्याला एकटे पाडणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे.”
शिवसेनेने यावेळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या
विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली.
तसेच अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांबाबत सर्व राजकीय पक्षांना सविस्तर माहिती देण्यात यावी,
अशी सूचना देखील करण्यात आली.
भारत सरकारचा उद्देश —
खासदारांच्या माध्यमातून विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या दहशतवादाविरोधातील स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणे,
आणि जागतिक सहमती मिळवून पाकिस्तानस्थित दहशतवादाचा बंदोबस्त करणे हा असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pooja-meshram-yanani-international-level-akolyacha-jhanda-fadkavala/