‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर कारवाई;

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर कारवाई;

नवी दिल्ली, दि. ९ मे : पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न होत

असताना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील चेक पोस्ट

आणि दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

Related News

भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ९ मेच्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत सुमारे

२६ ठिकाणी ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय लष्कराने अत्यंत तत्परतेने ही सर्व हल्ल्यांची प्रयत्न मोडून काढले.

या हल्ल्यांनंतर भारताने तात्काळ प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, जम्मू सीमेजवळ पाक सैन्याच्या

चेक पोस्ट आणि दहशतवादी तळ लक्ष्य करत त्यांचा पूर्णपणे नाश केला गेला.

या कारवाईनंतर आज सकाळी श्रीनगर शहरात स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले.

स्फोटाचे आवाज लक्षात येताच संपूर्ण शहरात सायरन वाजवण्यात आले आणि अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव

वीज पुरवठाही बंद करण्यात आला. सध्या काश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षा तैनात आहे.

भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत

कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि प्रत्येक हल्ल्याला दुपटीने उत्तर दिले जाईल.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistankadun-bharatchaya-lashkari-tansah-shalever-halla/

Related News