नवी दिल्ली – पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिम सीमेवर सातत्याने आगळीक सुरू असून,
ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमाने यांचा वापर करत
भारतातील लष्करी तळांसह नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
नियंत्रण रेषेवर सुमारे 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. भारताने
बहुतांश हल्ले निष्प्रभ केले असले तरी उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर आणि भटिंडा येथील
लष्करी तळांना काही प्रमाणात हानी पोहोचली आहे.
शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला.
विशेष म्हणजे या हल्ल्यात श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांसह एका शाळेलाही लक्ष्य करण्यात आले.
सीमारेषेवर गोळीबारही सुरु आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
न्यूज 2: भारतीय वायूदलाचा जोरदार प्रत्युत्तर हल्ला; पाकिस्तानच्या 5 तळांवर कारवाई
नवी दिल्ली – पाकिस्तानकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवायांना उत्तर देताना भारतीय
वायूदलाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय फायटर जेट्सनी पाकिस्तानच्या पाच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले.
रफिकी, मुरीद, चकलाला,
रहिम यार आणि सुकूर या पाकिस्तानच्या हवाई तळांवर लक्ष्य करण्यात आले असून, टेक्निकल इन्स्टॉलेशन,
कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रसाठ्याच्या गोदामांना मोठं नुकसान झालं आहे.
या कारवाईत कुसूर येथील रडार यंत्रणा आणि सियालकोट येथील लष्करी तळावरही हल्ला झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तान लाहोरवरून नागरी हवाई मार्गाचा वापर लष्करी हालचालीसाठी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
याशिवाय, भारताविरोधात सातत्याने अपप्रचार देखील सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Reload Also : https://ajinkyabharat.com/indian-cricket-moth/