पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांसह शाळेवर हल्ला

पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांसह शाळेवर हल्ला

नवी दिल्ली – पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिम सीमेवर सातत्याने आगळीक सुरू असून,

ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमाने यांचा वापर करत

भारतातील लष्करी तळांसह नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे.

Related News

नियंत्रण रेषेवर सुमारे 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. भारताने

बहुतांश हल्ले निष्प्रभ केले असले तरी उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर आणि भटिंडा येथील

लष्करी तळांना काही प्रमाणात हानी पोहोचली आहे.

शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला.

विशेष म्हणजे या हल्ल्यात श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांसह एका शाळेलाही लक्ष्य करण्यात आले.

सीमारेषेवर गोळीबारही सुरु आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

न्यूज 2: भारतीय वायूदलाचा जोरदार प्रत्युत्तर हल्ला; पाकिस्तानच्या 5 तळांवर कारवाई

नवी दिल्ली – पाकिस्तानकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवायांना उत्तर देताना भारतीय

वायूदलाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय फायटर जेट्सनी पाकिस्तानच्या पाच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले.

रफिकी, मुरीद, चकलाला,

रहिम यार आणि सुकूर या पाकिस्तानच्या हवाई तळांवर लक्ष्य करण्यात आले असून, टेक्निकल इन्स्टॉलेशन,

कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रसाठ्याच्या गोदामांना मोठं नुकसान झालं आहे.

या कारवाईत कुसूर येथील रडार यंत्रणा आणि सियालकोट येथील लष्करी तळावरही हल्ला झाला आहे.

दरम्यान, पाकिस्तान लाहोरवरून नागरी हवाई मार्गाचा वापर लष्करी हालचालीसाठी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

याशिवाय, भारताविरोधात सातत्याने अपप्रचार देखील सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Reload Also : https://ajinkyabharat.com/indian-cricket-moth/

 

Related News