नवी दिल्ली, ८ मे – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य
स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.
स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनेही भारतीय सेनेला भावनिक श्रद्धांजली अर्पण करत सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले – “या कठीण काळात आपल्या देशाच्या रक्षणासाठी
सज्ज असलेल्या आमच्या सशस्त्र दलांसोबत आम्ही ऐक्याने उभे आहोत आणि त्यांना सलाम करतो.”
पुढे लिहिताना कोहली म्हणतो – “त्यांच्या अटूट शौर्यासाठी आम्ही नेहमीच ऋणी राहू
आणि त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या बलिदानांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.”
याआधी नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मानेही भारतीय सेनेप्रती आपली भावना व्यक्त करत
एक प्रेरणादायी संदेश दिला होता. देशात युद्धजन्य तणाव निर्माण झाल्यामुळे IPL 2025 हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे.
भारतीय सेनेचे शौर्य, त्याग आणि निस्वार्थ सेवा याबाबत देशभरातून मान्यवरांकडून सलाम व्यक्त होत आहे.
विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचे हे शब्द भारतीय जवानांच्या मनोबलात निश्चितच भर घालणारे ठरतात.