नवी दिल्ली, ८ मे – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य
स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.
स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनेही भारतीय सेनेला भावनिक श्रद्धांजली अर्पण करत सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
Related News
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले – “या कठीण काळात आपल्या देशाच्या रक्षणासाठी
सज्ज असलेल्या आमच्या सशस्त्र दलांसोबत आम्ही ऐक्याने उभे आहोत आणि त्यांना सलाम करतो.”
पुढे लिहिताना कोहली म्हणतो – “त्यांच्या अटूट शौर्यासाठी आम्ही नेहमीच ऋणी राहू
आणि त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या बलिदानांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.”
याआधी नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मानेही भारतीय सेनेप्रती आपली भावना व्यक्त करत
एक प्रेरणादायी संदेश दिला होता. देशात युद्धजन्य तणाव निर्माण झाल्यामुळे IPL 2025 हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे.
भारतीय सेनेचे शौर्य, त्याग आणि निस्वार्थ सेवा याबाबत देशभरातून मान्यवरांकडून सलाम व्यक्त होत आहे.
विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचे हे शब्द भारतीय जवानांच्या मनोबलात निश्चितच भर घालणारे ठरतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/siren-kadhi-vajto-hawai-hallya-hallyachaya-dhokyavi-sasiyan-mito-kiti-vachhanyasathi/