नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे
पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर
भारत-पाकिस्तानमधील तणाव टोकाला गेला असून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Related News
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट आयोजित केला.
यामध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या धोका निर्माण झाल्यास स्वत:चा जीव कसा वाचवायचा,
याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला,
ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली – नेमका हा सायरन कधी वाजतो? आणि जीव वाचवण्यासाठी किती वेळ मिळतो?
सायरन कधी वाजतो?
जेव्हा शत्रू राष्ट्राकडून रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करतात, तेव्हा हवाई
दलाचे रडार तत्काळ ते ओळखतात. त्या आधारे संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी ६० सेकंदांचा एअर रेड सायरन वाजवला जातो.
या सायरनचा अर्थ – नागरिकांनी त्वरीत सुरक्षित स्थळी जायला हवं.
जीव वाचवण्यासाठी मिळतो किती वेळ?
हल्ल्याची शक्यता असलेल्या भागात हा सायरन वाजवण्यात येतो, ज्यामुळे लोकांना फक्त सुमारे एक मिनिट
मिळतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. हा सायरन वाजल्यावर तातडीने जवळच्या बंकरमध्ये किंवा सुरक्षित इमारतीच्या खालील मजल्यावर जाण्याचा सल्ला दिला जातो.
सायरन मागचं तंत्रज्ञान काय?
रडार प्रणाली शत्रूच्या हालचाली ओळखते आणि त्या आधारे तात्काळ रेड अलर्ट जारी केला जातो.
त्यानंतर स्थानिक यंत्रणांमार्फत सायरन सक्रिय केला जातो. ही प्रणाली मुख्यतः लष्करी तळ, विमानतळ तसेच संवेदनशील नागरी भागांमध्ये कार्यरत असते.
भारतीय नागरिकांना अशा संकट काळात सजग राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/district-chief-srirang-pinjarkar-yancha-call/