आफ्रिदीचा बेताल आरोप….

आफ्रिदीचा बेताल आरोप; ओवैसींचा टोला, कनेरिया आणि अझरुद्दीनची जोरदार प्रतिक्रिया

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.

पहलगाम हल्ला भारताने स्वतः घडवून आणला आहे आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत,

असे संतापजनक वक्तव्य त्याने केले आहे. तसेच काश्मीरमध्ये तैनात असलेल्या

Related News

आठ लाख भारतीय सैन्याने काहीच करू शकले नाही, असा दावा आफ्रिदीने केला आहे.

या बेताल वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीला “जोकर” म्हटले आहे.

तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आफ्रिदीवर ताशेरे ओढत,

“तो अतिरेकी विचारांशी जोडलेला आहे” असे म्हटले असून भारतीय टेलिव्हिजनवर त्याला स्थान देऊ नये, असा सल्ला दिला आहे.

दरम्यान, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही प्रतिक्रिया देताना,

भारताने पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेट खेळू नये,” असे ठामपणे सांगितले आहे.

“अतिरेक्यांनी दिलेल्या जखमा क्रिकेटमुळे भरून येऊ शकत नाहीत,” असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक पावले उचलली असून, शोएब अख्तरच्या युट्यूब

चॅनेलसह पाकिस्तानचे १६ इतर युट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्यात आले आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/elphinston-pulachaya-margayal-adha/

Related News