श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दोन
Related News
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
दहशतवाद्यांपैकी एका – आसिफ शेख – याचे घर स्फोटाच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले असून,
दुसऱ्या दहशतवादी आदिलच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे.
दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त; सुरक्षा यंत्रणांचा मोठा मोर्चा
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅली (पहलगाम) येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठा मोर्चा उघडला.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवादी आसिफ शेखच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती,
ज्यात मोठा स्फोट झाला. त्याचा संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. दुसरीकडे,
आदिल या दुसऱ्या दहशतवाद्याच्या घरावर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओतून ओळख; दोघेही लष्करशी संबंधित
हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,
ज्यात आसिफ व आदिल यांची ओळख पटली.
ते हल्ल्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षाबळांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी अनंतनागचा
आदिल शहा वगळता उर्वरित सर्वजण हिंदू धर्मीय होते.
गुरुवारी बहुतांश मृतांना अखेरचा निरोप देण्यात आला.
NIA चौकशीत व्यस्त, लष्कर-CRPFचा शोधमोहीम सुरू
दहशतवादी धर्म विचारून गोळ्या झाडत होते, असा आरोप आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी NIA
(राष्ट्रीय तपास संस्था) करत असून, भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर
पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे मोहिम राबवत आहेत.
सुरक्षाबळांनी आतापर्यंत २००० लोकांची चौकशी केली असून, अनेकांना ताब्यात घेतलं आहे.
हल्ल्यात सहभागी अन्य दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांचं मत आहे की हे दहशतवादी अजूनही पहलगाम परिसरातच लपलेले असण्याची शक्यता आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/comes-come-terrorism/