मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर गावात आज एक अत्यंत क्लेषदायक चित्र समोर आलं –
नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही गावकऱ्यांच्या संतापाचा पारा
अधिकच उंचावला. कारण मृताच्या सन्मानासाठीच नव्हे, तर माणुसकीच्या नावानेही प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता म्हणजे अपमानाचं जिवंत उदाहरण आहे.
ना पायवाट, ना सांडपाण्याचा बंदोबस्त. त्यामुळे अंत्ययात्रा काढताना गावकऱ्यांना घाण पाण्यातून वाट काढावी लागते.
मृताच्या कुटुंबासाठी ही एक दुहेरी शिक्षा ठरते – एकीकडे आप्तजनाच्या निधनाचं दु:ख आणि दुसरीकडे त्या अंतिम संस्कारासाठी होणारी अवहेलना.
एक ज्येष्ठ ग्रामस्थ म्हणाले –
“एवढे वर्ष झाले, प्रशासन बदलले, पदाधिकारी बदलले… पण स्मशानभूमीचा प्रश्न मात्र तसाच आहे.
आम्हाला ना रस्ता, ना पाणी, ना वीज. फक्त आश्वासनं मिळतात.”
महिलांनीही आपला आवाज ठामपणे उठवला –
“जेव्हा पुरुषही या रस्त्यावरून जायला घाबरतात, तेव्हा आम्हा महिलांची काय अवस्था होत असेल?”
आज सकाळी गजानन पंदेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.
अंत्यसंस्कारासाठी त्यांची अंत्ययात्रा जेव्हा नाल्यातून जावी लागली,
तेव्हा गावातील प्रत्येक डोळा पाणावला… पण हे अश्रू केवळ शोकाचे नव्हते – ते अपमानाचे होते.
प्रश्न एवढाच आहे – गावकऱ्यांच्या मृत्यूनंतरही जर सन्मान नसेल,
तर लोकशाहीत ‘जनतेचा राजा’ असलेल्या माणसाला न्याय कधी मिळणार?
हिरपूरच्या या दुःखाला आणि संतापाला उत्तर फक्त विकासात नाही – तर जबाबदारी स्वीकारण्यात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/passo-badhel-kasamapurat-chorratyancha-admission/