अकोला, १३ मार्च २०२५ – मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून,
बुधवारी विदर्भातील सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमान अकोला शहरात नोंदविण्यात आले.
नागपूरसह अनेक शहरांमध्येही तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे.
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ४० अंशांच्या वर गेले असून, उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे हवामान
विभागाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असून,
विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विशेषतः अकोला शहरात १४ आणि १५ मार्च रोजी उष्णतेची लाट राहू शकते,
त्यामुळे तापमान आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी,
पुरेसे पाणी प्राशन करावे आणि अत्यावश्यक कारणांशिवाय दुपारच्या उन्हात घराबाहेर पडू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
🌡 सावध राहा, उष्णतेपासून बचाव करा!
Read more news here : https://ajinkyabharat.com/wounded-sayela-male-jeevan-jeevadan-forest/