उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने सामने आले.
मात्र, यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या
Related News
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समोरा समोर आले.
मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. तर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन झाले.
राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा विधानभवनात आमना सामना झाला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सोबतच होते यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आले.
उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची धावती भेट जाली.
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन देखील झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणं टाळलं.
एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरुन भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक होणे अशक्य असल्याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले होते.
आदित्य ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत, मुंबईतील खड्ड्यांवरुन त्यांना टोला लगावला.
त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं मात्र मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. असं आदित्य म्हणाले.
तर मुंबईत सुरु असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरुन आदित्य यांनी सरकारला टोला लगावला.
मुंबई महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदत आहे
की त्यांना खोदकामात काही तरी सापडणार असावं असं वाटतं, असं आदित्य म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-yehetha-mahabodhi-mahavihar-mahamuktisathi-movement/