पहलगाममधील निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ठामपणे घेतला आहे.
मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त
काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.
Related News
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
या कारवाईत अवघ्या २३ मिनिटांत दहशतवादी गट लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या बस्तानांवर कडाडून हल्ला करण्यात आला.
भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घडामोडीनंतर पाकिस्तानमधील नागरिक सैरभैर झाले असून, गुगलवर
“ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर अटैक काय आहे?” यांसारख्या कीवर्डसचा शोध घेत आहेत.
गुगल ट्रेंड्सनुसार, पाकिस्तानमध्ये “India Attack Bahawalpur”, “India Attack on Pakistan Today”,
“India Strikes Pakistan” असे अनेक कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसेच, “Indian Army vs Pakistani Army”,
“Most Powerful Army” यांसारख्या शोधवाक्यांतून भारतीय लष्कराविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले असल्याचे समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्यात नवविवाहित महिलांचे ‘सिंदूर’ पुसले गेले, त्या वेदनेचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी हे नाव देण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-halliyala-sadetod-reply/