जिल्ह्यात १९ हजार शेतकऱ्यांवर अस्मानीचा फटका
परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी
धुमाकूळ घातला. यामध्ये १९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
आहे. शिवणी आरमाळ शिवारात सोयाबीनच्या गंजीवर वीज
कोसळली. यात सोयाबीन जळून खाक झाल्याने अंढेरा येथील
शेतकऱ्याचे नुकसान झाले. सोयाबीन, पावसाने फळपिकांची
मुसळधार नासाडी झाली. जिल्ह्यात या आठवड्यात चिखली,
खामगाव व मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व वादळी पावसाने
१८ हजार ९२४ शेतकऱ्यांचे १५ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील
पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कपाशी, सोयाबीन,
भाजीपाला व मका पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी
मेटाकुटीस आला आहे. १८ व १९ ऑक्टोबरला चिखली
तालुक्यातील ११ गावे, खामगाव ५५ गावे, मेहकरमध्ये ६ अशा
७२ गावांना अतिवृष्टी व वादळी पावसाचा तडाखा बसला. या
गावांमधील १८ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टी व
वादळाने हानी झाली. या तीन तालुक्यांमध्ये १५ हजार २३३.७०
हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. चिखली तालुक्यात २४२
शेतकऱ्यांच्या ६९.७० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली.
खामगाव तालुक्यात १८ हजार २३७ शेतकऱ्यांचे १४ हजार ८९६
हेक्टर क्षेतावरील सोयाबीन, कपाशी, मका, व भाजीपाला पिकांचे
नुकसान झाले. मेहकर तालुक्यात ४४५ शेतकऱ्यांच्या मालकीच्या
२६८ हेक्टरवरील कपाशी व सोयाबीनचीहानी झाली. दसरा
अंधारात गेला, आता दिवाळीचा सणही काळोखातच जाणार
आहे. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. वेचणीला
आलेले पांढरे सोने काळवंडले आहे. सरकी फुगून वाती तयार
झाल्या आहेत. त्याला कोंब फुटले आहे. अंढेरा मंडळातील पाडळी
शिंदे, मेंडगाव, सावखेड नागरे, बायगाव बुद्रुक, शिवणी आरमाळ,
सेवानगर, अंढेरा या गावांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले
आहे. शासनाने तातडीने सर्वे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी
मागणी होत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/union-bank-of-india-fined-rs-54-lakh-by-financial-intelligence-system/