मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह १४ जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे,
Related News
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
तर दोन जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
किनारी जिल्ह्यांमध्ये धोक्याची घंटा
कोकणातल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह
मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे.
विशेषतः २३ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना जोरदार इशारा देण्यात आला आहे.
समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि शक्य असल्यास
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका
पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची
शक्यता असल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः प्रवाशांनी घाटमार्गांचा प्रवास टाळावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच मार्गक्रमण करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा कहर
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा,
नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट
आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान
होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता
या पावसामुळे शहरांत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, विजेच्या तारा,
झाडं पडण्याचे प्रसंग वाढू शकतात. नागरिकांनी झाडाखाली उभं राहणं टाळावं,
विजेच्या खांबांपासून दूर रहावं आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय योजावेत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchaya-panyachaya-threaters-bharata-bharatacha-sangat/