उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.
बुधवारी सायंकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस जवळपास एक तास बरसला.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
मृग नक्षत्राला सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी पावसाच्या दमदार हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला.
अचानक सुरू झालेल्या पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती.
तर उंबर्डा बाजार ते कारंजा लाड रस्त्यावरील जांब जवळ असलेल्या बाभळीचे मोठे वृक्ष रस्त्यावर
उखडून पडल्याने बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मागील आठवड्यात तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे होता.
अधून मधून तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
मात्र, काल झालेल्या दमदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे उंबर्डा बाजार परिसरातील काही
भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यात कारंजा रस्त्यावरील बाभळीचे वृक्ष तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक पूर्णतः
विस्कळीत झाली.
झाडाच्या फांद्या छाटून रस्त्यावरील झाडे बाजूला करून मार्ग मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली
असली तरी शेतकरी मात्र सुखावला असून शेती कामाला वेग आलेला दिसून येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/inzori-campus-chakri-vadalacha/