उद्धव ठाकरे वाघासारखे लढले -ममता बॅनर्जी

विधानसभेला

विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द

उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.

तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.

Related News

मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,

असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री

ममता बॅनर्जी यांनी केले.

ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.

यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.

आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,

असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू

किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.

त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.

मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/

Related News