शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंता
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला असला,
तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
Related News
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसानेहजेरी लावली असून...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्य...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,...
Continue reading
अनेक भागात पेरण्या रखडल्या असून, जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अकोल्यात विखुरलेल्या स्वरूपात का होईना,
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने ८० टक्क्यांच्या वर पेरण्या आटोपल्या असल्या,
तरी काही तालुक्यांमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती नाही.
अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
याशिवाय मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते.
कपाशी पिकाच्या लागवडीसाठी दमदार पावसाची गरज भासते;
मात्र जुलै महिन्याच्या ८ व ९ तारखेला कोसळलेल्या पावसानंतर पावसाने ब्रेक घेतला असून,
पावसाअभावी रोवणीची कामे रखडली आहेत.
जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.
पाऊस लांबल्याने मूग, उडीद या कडधान्याची लागवड स्थिरावली आहे.
१५ जुलैपर्यंत कडधान्यांची पेरणी करता येईल. त्यानंतर मूग,
उडीद आणि भुईमुगाची पेरणी करू नये, अशी कृषी विभागाची शिफारस आहे.
त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, कापूस पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे.
या पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पावसाची गरज आहे.
पेरणी झालेली पिके पावसाअभावी उलटण्याचा धोका आहे.
अनेक ठिकाणी पेरण्या जगविण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यामधून
सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mg-shows-glimpse-of-cyber-u200bu200bconcept/