Dhananjay Deshmukh Big Statements : दोन दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येवेळीचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत.
त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर आता धनंजय देशमुख यांनी एक मोठी मागणी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवेळीचे छायाचित्र समाज माध्यमांवर फिरत आहेत.
Related News
मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
...
Continue reading
दिल्ली |
मॉडेल टाउन: राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.
माचिस न दिल्यामुळे बाबू नावाच्या तरुणाने दोन व्यक्तींना पाठलाग करत
क्रूरपणे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आह...
Continue reading
मुंबई |
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना
(UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी
...
Continue reading
मुंबई प्रतिनिधी |
मुंबईतील भांडुप परिसरातील झिया अन्सारी या कुख्यात गुंडाने आपल्या वाढदिवसाचा अनोख्या
पद्धतीने जल्लोष साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अलीकडेच जेलमध...
Continue reading
पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरल...
Continue reading
सुनील साकेत | आग्रा (उत्तर प्रदेश)
आग्रा शहरातील स्टेशन रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये
घटतौलीची तक्रार करणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले.
ग्राहकाने केवळ 5 ल...
Continue reading
उमरा (ता. अकोट, जि. अकोला) | प्रतिनिधी – रामेश्वर कावरे, अजिंक्य भारत
उमरा गावात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ८ दिवसांचे
प्रशिक्षण शिबिर आयोजि...
Continue reading
नोएडा प्रतिनिधी |
नोएडाच्या सेक्टर-33 येथील इस्कॉन मंदिराजवळील एलिवेटेड रोडवर एका तरुणाने
थार गाडीच्या छतावर चढून मोठ्या आवाजात म्युझिक लावून डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.
...
Continue reading
हैदराबाद प्रतिनिधी |
हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक आगीचा मोठा प्रसंग घडला.
ही घटना त्या हॉटेलमध्ये घडली आहे जिथे आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे ख...
Continue reading
मुंबई प्रतिनिधी |
भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.
मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इम...
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक.
त्यांच्या विचारांनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेतली. याच महामानवाची जयंती १४ एप्रिल रोजी शेकापूर फाटा
...
Continue reading
मूर्तिजापूर |
तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (१२ एप्रिल) एक हृदयद्रावक घटना घडली.
सुधाकर वामनराव ठाकरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू...
Continue reading
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
तर आता याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्या वेदना पुन्हा समोर आल्या आहेत. त्यांनी गंभीर आरोप करत एक मोठी मागणी केली आहे.
आरोपींना भर चौकात सोडा…
खून प्रकरणातील आरोपी खंडणी मागतात, चोऱ्या करतात. हे पूर्वीपासूनच गुन्हेगार आहेत हे आम्हाला माहीत होतं.
संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने आरोपींनी मारलं ते सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे.
मी त्यांचा रक्ताचा भाऊ आहे मला तर वेदना होणं साहजिक आहे, असे धनंजय देशमुख यांनी मन मोकळं केलं.
संतोष देशमुख यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत.
आरोपींना भरत चौकात सोडलं पाहिजे. त्यांना जात धर्म काहीच नाही, समाज त्यांना शिक्षा देईल, असे मोठे वक्तव्य देशमुखांनी केलं आहे.
कुणाच्या सांगण्यावरून केला खून?
खून प्रकरणातील आरोपींनी हे कृत्य कोणाच्या तरी सांगण्यावरून केला, यांना अशाप्रकारे हत्या करण्याचे ट्रेनिंग कोणी दिलं,
असा मोठा सवाल धनंजय देशमुख यांनी विचारला आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे कृत्य केले आहेत. मात्र निराधार लोकांनी आवाज उठवला नाही.
आरोपींनी अनेकांचे संसार उध्वस्त केले. अनेक लेकरांना अनाथ केलं आहे, कोणाचा आधार नसल्याने अनेक लोकांनी न्याय मागितला नाही, असे ते म्हणाले.
आरोपींना वेगळी शिक्षा झाली पाहिजे. आतापर्यंत आम्ही न्याय मागत होतो. मात्र शासनाने यांना कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल यावर विचार करावा.
आरोपी सैतान आहेत माणूस मेल्यानंतर ही त्यांनी मृतदेहाची विटंबना केली. एक नंबरचा आरोपी जो आहे
तो शपथपत्रात सांगतो की हे सगळं माझं आहे याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे सूचक विधानही देशमुख यांनी केले आहे.
न्याय द्या, पोलीस यंत्रणा त्यांच्या खिशात
खून प्रकरण हा विषय आमच्या कुटुंबा पुरता नाही तर संपूर्ण गावकऱ्यांचा आणि समाजाचा आहे
या प्रकरणात लोक जो निर्णय घेतील त्यामध्ये मी सहभागी असेल. फरार आरोपीचा तपास यंत्रणा घेत आहे.
सध्या अनेक ठिकाणी आंदोलन आणि बंद पुकारण्यात येत आहेत ते जनतेने संवेदनशील पणे करावेत
आम्हाला न्याय पाहिजे, सर्व पोलीस यंत्रणा यांच्या खिशामध्ये आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.
आरोपी परत परत चुका करत होते ते सैतानी प्रवृत्तीचे आहेत, खुनाची घटना घडल्यानंतर देखील यांनी
अनेक प्लॅन केले आहेत त्याची देखील वेगळी टिप्पणी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
Read more here :
https://ajinkyabharat.com/bhujbalancharya-minister-motha-adatha-anjali-damania-yancha-theate-corte-janyacha-gesture-due-to-kay/