Dhananjay Deshmukh Big Statements : दोन दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येवेळीचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत.
त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर आता धनंजय देशमुख यांनी एक मोठी मागणी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवेळीचे छायाचित्र समाज माध्यमांवर फिरत आहेत.
Related News
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे ल...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
यामुळे...
Continue reading
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फ...
Continue reading
अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्या...
Continue reading
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
तर आता याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्या वेदना पुन्हा समोर आल्या आहेत. त्यांनी गंभीर आरोप करत एक मोठी मागणी केली आहे.
आरोपींना भर चौकात सोडा…
खून प्रकरणातील आरोपी खंडणी मागतात, चोऱ्या करतात. हे पूर्वीपासूनच गुन्हेगार आहेत हे आम्हाला माहीत होतं.
संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने आरोपींनी मारलं ते सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे.
मी त्यांचा रक्ताचा भाऊ आहे मला तर वेदना होणं साहजिक आहे, असे धनंजय देशमुख यांनी मन मोकळं केलं.
संतोष देशमुख यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत.
आरोपींना भरत चौकात सोडलं पाहिजे. त्यांना जात धर्म काहीच नाही, समाज त्यांना शिक्षा देईल, असे मोठे वक्तव्य देशमुखांनी केलं आहे.
कुणाच्या सांगण्यावरून केला खून?
खून प्रकरणातील आरोपींनी हे कृत्य कोणाच्या तरी सांगण्यावरून केला, यांना अशाप्रकारे हत्या करण्याचे ट्रेनिंग कोणी दिलं,
असा मोठा सवाल धनंजय देशमुख यांनी विचारला आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे कृत्य केले आहेत. मात्र निराधार लोकांनी आवाज उठवला नाही.
आरोपींनी अनेकांचे संसार उध्वस्त केले. अनेक लेकरांना अनाथ केलं आहे, कोणाचा आधार नसल्याने अनेक लोकांनी न्याय मागितला नाही, असे ते म्हणाले.
आरोपींना वेगळी शिक्षा झाली पाहिजे. आतापर्यंत आम्ही न्याय मागत होतो. मात्र शासनाने यांना कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल यावर विचार करावा.
आरोपी सैतान आहेत माणूस मेल्यानंतर ही त्यांनी मृतदेहाची विटंबना केली. एक नंबरचा आरोपी जो आहे
तो शपथपत्रात सांगतो की हे सगळं माझं आहे याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे सूचक विधानही देशमुख यांनी केले आहे.
न्याय द्या, पोलीस यंत्रणा त्यांच्या खिशात
खून प्रकरण हा विषय आमच्या कुटुंबा पुरता नाही तर संपूर्ण गावकऱ्यांचा आणि समाजाचा आहे
या प्रकरणात लोक जो निर्णय घेतील त्यामध्ये मी सहभागी असेल. फरार आरोपीचा तपास यंत्रणा घेत आहे.
सध्या अनेक ठिकाणी आंदोलन आणि बंद पुकारण्यात येत आहेत ते जनतेने संवेदनशील पणे करावेत
आम्हाला न्याय पाहिजे, सर्व पोलीस यंत्रणा यांच्या खिशामध्ये आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.
आरोपी परत परत चुका करत होते ते सैतानी प्रवृत्तीचे आहेत, खुनाची घटना घडल्यानंतर देखील यांनी
अनेक प्लॅन केले आहेत त्याची देखील वेगळी टिप्पणी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
Read more here :
https://ajinkyabharat.com/bhujbalancharya-minister-motha-adatha-anjali-damania-yancha-theate-corte-janyacha-gesture-due-to-kay/