[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आता, आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji maharaj) स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता, या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैद राहिलेले ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही याठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालय आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत. देशभरातली पर्यटकांसाठी प्रेरणास्थान बनेल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहीले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र, या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार ‘लय भारी’

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (D...

Continue reading

पुण्यातील हिंजवडीत काल (बुधवारी, ता 20) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं संतापजनक कारण समोर आलं आहे. चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर आता हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप, त्याच्या पत्नी आणि भावाने केला आहे. वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही... आरोपी जनार्दन हंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल उपस्थित करत ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भावजी देखील होते, त्यामुळे ते आग कशी लावतील शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणतांना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत, जनार्दन हंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. माझा भाऊ निर्दोष असताना देखील त्याला या प्रकरणात गोवलं जात आहे. जर त्याने ते केमिकल कंपनीतून घेतल्याचा दावा केला जातो. पण, ज्या कंपनीतून एक छोटा कागद घेऊन जाऊ शकत नाही त्या कंपनीतून त्याने हे केमिकल कसं नेलं. ते कॅन नेत असताना त्याला का अडवलं गेलं नाही. हा माझा अक्षेप आहे. सकाळीपासून तो स्टेबल नसताना पोलिसांनी त्याची दोन ते अडीच तास काय माहिती घेतली. त्याची स्थिती ठिक नसताना पोलिस त्याच्याकडून अडीच ते तीन तास स्टेटमेंट घेतात. त्या गाडीमध्ये एक महिला आणि बाकी सर्व पुरूष होते. जर त्याने गाडी लॉक केली तर त्यामध्ये तीन लोक असे आहेत की त्यांना खरचटल देखील नाही. जर त्याने दरवाजा लॉक केला असताना तर मग हे लोक कसे बाहेर आले, असा सवाल चालक जनार्दन हंबर्डीकरचा भाऊ यांनी म्हटलं आहे. त्या बसमध्ये माझे भाऊजी गाडी लॉक होती तर इतर वाचलेले सहा ते सात जण बाहेर कसे आले मग? दरवाजा उघडा नव्हता तर बाकी कसे बाहेर आले असते. एखादा दुसरा खिडकी तोडून बाहेर आले असते. पण सगळेच खिडकी तोडून बाहेर आले नसते, त्या बसमध्ये माझे भाऊजी विश्वास खानविलकर देखील होते. ते सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते सर्वात शेवटी बाहेर पडले होते. दरवाडा उघडा होता त्यामुळे ते बाहेर पडले. असा कोणता भाऊ असेल जो आपल्या बहिणीचं कुंकू पुसायला तयार असेल. माझा भाऊ निर्दोष आहे. आम्हाला न्याय मिळावा, असं विजय हंबर्डीकर चालक जनार्दन हंबर्डीकरच्या भावाने म्हटलं आहे. पत्नी काय म्हणाली? जी कारणे सांगितली जात आहेत. बोनस मिळाला नाही इतर काही गोष्टी त्यापैकी काहीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिले नसते. ते कामाला जातात तसे मी त्यांना सकाळी सहा वाजेपर्यंत डब्बा बनवून देत होते. ते शुगर पेशंट होते. ते 2006 पासून तिथे होते. जर त्या कंपनीतील लोकांना ते केमिकल घेऊन जाताना दिसले तर त्यांनी त्याबद्दल विचारायला हवं होतं. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे याचा तपास झाला पाहिजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे असंही चालकाची पत्नी नेहा हंबर्डीकरने मागणी केली आहे.

माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जातंय, जळालेल्या बसमध्ये चालकाचे सख्खे भावोजी; हंबर्डीकरांच्या पत्नीचा दावा, नेमकं काय सांगितलं?

Pune Hinjwadi Bus Fire: आरोपी जनार्दन हंबर्डीकर पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविलाच कसा असा सवाल उपस्थित करत त्याच्या पत्नी अन् भावाने त्याला या प्रकरणात गोवलं ...

Continue reading

CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली. राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील स...

Continue reading

तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान

तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान

अकोट | प्रतिनिधी अकोट फाईल येथील भारत नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली, ज्यात तीन घरे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे घरगुती साहित्य, विवाहासाठी आणलेले ...

Continue reading

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले. पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्भीड पत्रकारितेवर हल्ला? विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा! पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोज...

Continue reading

मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केली. चोरट्यांनी मेडिकलमध्ये प्रवेश करून सुमारे १० ते १५ हजार रुपयांचे साहित्य, दानपेटीतील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केला. घटनाक्रम: शेख गुड्डू शेख खलील यांनी दररोजप्रमाणे रात्री १० वाजता मेडिकल बंद करून घरी गेले. रात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला. सुमारे पाऊण तास मेडिकलची संपूर्ण तपासणी करून रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. पोलीस तपास सुरू: घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे व गजानन खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. स्थानिकांची मागणी: चोरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मेडिकलसमोर गर्दी केली. पोलीस तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काश्मीरा मेडिकलमध्ये मध्यरात्री चोरी – सीसीटीव्हीत चोरटे कैद

मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून च...

Continue reading

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच ...

Continue reading

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. यंदाच्या IPL 2025 मध्ये बुमराहच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स आहे. आयपीएलमध्ये खेळता यावं, य...

Continue reading

बारोट व्हॅलीची खासियत आम्ही तुम्हाला सांगतो की बारोट गाव 1920च्या दशकात शानन जलविद्युत प्रकल्पासाठी बांधण्यात आले होते. पण आज ते एक पर्यटन स्थळ बनले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, बारोट हा कुल्लू खोऱ्याला कांगडा खोऱ्याशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग होता. पूर्वी हा मार्ग खेचरांच्या वापरासाठी ओळखला जात होता. पण आता हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या, थंड वारे, देवदारचे घनदाट जंगल आणि ॲडवेंचर ॲक्टिव्हिटी साठी ओळखले जाते. बारोट व्हॅलीमध्ये देवदारचे उंच घनदाट जंगल, थंड वारे आणि बर्फाच्छादित पर्वत आहेत जे त्याला स्वर्ग बनवतात. मनाली आणि शिमला प्रमाणे इथे गर्दी कमी आहे. जर तुम्हाला एकटे काही शांत क्षण घालवायचे असतील तर बारोट व्हॅली तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बजेट फ्रेंडली देखील आहे. बारोट व्हॅली म्हणजेच मिनी स्वित्झर्लंडमध्ये काय पहावे? बारोट व्हॅलीमध्ये सुंदर धरणे आहेत. तुम्हाला धबधबे, सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आणि नद्या पाहायला मिळतील. येथील उहल नदीत शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी मासेमारी करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील बारोट व्ह्यू पॉइंटवरून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय पाहू शकता. नेहरा ट्रॅकवर जाऊन तुम्ही खूप ॲडवेंचर करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्हाला हिमाचल गावांची संस्कृती आणि जीवनशैली जवळून पाहता येईल. जर तुम्ही इथे आलात तर घनदाट जंगलात ट्रेकिंग करायला विसरू नका. घनदाट जंगलातून ट्रेकिंग केल्याने तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. बारोट व्हॅलीला कसे पोहोचायचे? बारोट व्हॅलीपर्यंत पोहोचणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला दिल्लीहून जोगिंदर नगरला थेट बसने जावे लागेल. जोगिंदर नगरला पोहोचल्यानंतर, 35 किमी पुढे असलेल्या या दरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्थानिक बस किंवा टॅक्सी देखील मिळेल. येथे प्रवास करण्याचे बजेटही खूपच कमी आहे. तुम्ही फक्त 4-5 हजार रुपयांमध्ये हे सुंदर ठिकाण एक्सप्लोर करू शकता.

भारताचे हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ तुम्ही पाहिलंत का? असा बनवा तेथे फिरण्याचा प्लॅन

तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे पर्वतांचे सौंदर्य, हिरवळ आणि गर्दीपासून दूर शांत वातावरण असेल. आम्ही तुमच्यासाठी मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेले एक अद्भुत ठिकाण आहे...

Continue reading

Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने-चांदीचा झंझावात, सलग चौथ्या दिवशी दरवाढीची मोहीम, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने-चांदीचा झंझावात, सलग चौथ्या दिवशी दरवाढीची मोहीम, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने आणि चांदीची घोडदौड कायम आहे. गाझा पट्टीत शांतता नांदल्यानंतर आता युक्रेन-रशियात सुद्धा शांतीपर्व सुरू होत आहे, पण त्याचे कसेलच सोयरसुतक...

Continue reading