प्रतिनिधी : योगेश आगासे
“एसटीचा प्रवास सुखाचा” ही एसटी महामंडळाची ओळख असली, तरी मूर्तिजापूर शहरात सध्या हा प्रवास थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील आठवडी बाजारालगत असलेल्या उड्डाणपुलावर एसटी बस थांबवून प्रवाशांना उतरविले जात असल्याने कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
मूर्तिजापूर शहरातून तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून उत्तर दिशेकडे दर्यापूरसह परिसरातील ग्रामीण भागात जाण्यासाठी हा उड्डाणपूल एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या पुलावर दिवसभर अवजड वाहनांसह खासगी वाहने, दुचाकी व एसटी बसेसची सतत वर्दळ असते. मात्र, दर्यापूरकडे जाताना उजव्या बाजूस असलेल्या थोड्याशा मोकळ्या जागेत खासगी प्रवासी वाहने आणि एसटी बसेस थांबवून प्रवासी उतरविले जात असल्याचे दृश्य नित्याचे झाले आहे.
या ठिकाणी उड्डाणपुलाच्या कडेला मोठी नाली असल्याने प्रवाशांना उतरतानाच जीव मुठीत घ्यावा लागत आहे. घाईगडबडीत बसमधून उतरताना नालीत पडण्याचा धोका कायम असतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच लहान मुलांसाठी ही जागा अत्यंत धोकादायक ठरत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
Related News
“Maharashtrachi Hasyajatra फेम विराज जगतापचा भीषण अपघात; मनगटावर शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बदलापूर प्रशासनवर नागरिक संताप”
एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांचा त्रास वाढला
पेट्रोल टंचाईच्या अफवेने टाकी फुल केली आणि दुचाकी पेटली! अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना
Satara Accident: कॉलेजमधून निघताना प्राध्यापिकेचा दुर्दैवी मृत्यू, भाजी मंडईत कार धडकून महिला ठार
हर्षिल कालिया मृत्यू: जयपूरमध्ये अभिनेत्रीचा भीषण कार अपघात, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर
राजमाता जिजाऊ बस सेवा राज्यात सुरू; 3,000 स्मार्ट बसेस लवकरच मुंबई-पुणे-नागपूर मार्गावर धावणार
पुण्यातील मित्रांचा प्रवास दुःखात संपला; कोटा एक्सप्रेसवेवर 3 जणांचा मृत्यू
नितीन विद्यालय समोरील रस्त्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; अखिल भारतीय मराठा महासंघाचा तातडीने गतिरोधक बसवण्याचा इशारा
शेरवाडी ग्रामपंचायतीवर २४ लाखांच्या कामात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
शालेय शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ होणार, पाचवी ते सातवीसाठी 250 तर आठवी ते दहावीला 400 रुपये प्रस्ताव
रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन परवान्यांवर 9 मार्चपासून स्थगिती
मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
या उड्डाणपुलाच्या परिसरातच मूर्तिजापूर शहर व तालुक्याचा कणा मानला जाणारा आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा परिस्थितीत उड्डाणपुलावर बस थांबविल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिणामी, रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर आपत्कालीन सेवा अडकल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकणारी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
नागरिकांनी याबाबत अनेकदा तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. किमान बाजाराच्या दिवशी तरी वाहतूक नियंत्रक नेमावा, अथवा या उड्डाणपुलावर बस थांबविण्यास पूर्णतः बंदी घालावी, अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता बंडू डाखोरे यांनी सांगितले की, “संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जीविताचे महत्त्व ओळखून तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. संबंधित विभागांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घ्यावी.”दरम्यान, एसटी आगार व्यवस्थापक हेमंत चांदुरकर यांनी स्पष्ट केले की, “यापूर्वी सर्व चालक व वाहकांना संबंधित थांब्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”तरीही प्रत्यक्ष परिस्थिती पाहता तातडीने ठोस निर्णय व अंमलबजावणीची गरज आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल मूर्तिजापूरकर विचारत आहेत.
