श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्तानी अतिरेकी ठार केले आहेत.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
“जो सिंदूर मिटवेल, तो मातीत मिसळेल…
बर्फ वितळताच पाकिस्तानातून घुसखोरी
पोलिस आणि लष्करी सूत्रांनुसार, या अतिरेक्यांनी पाकिस्तानातून बर्फ वितळण्याच्या हंगामाचा
फायदा घेत भारतात घुसखोरी केली होती. दक्षिण काश्मीरमध्ये शुकरू-केलर परिसरात तीन
ते चार अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले.
अतिरेक्यांकडून गोळीबार, चोख प्रत्युत्तर
अतिरेकींनी घेरले गेल्याचे लक्षात येताच गोळीबार सुरू केला. मात्र, सुरक्षा दलांनी अचूक प्रत्युत्तर
देत तीन अतिरेकी ठार केले. चकमकीनंतर परिसरात अजून
कोणी अतिरेकी लपले आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
परिसरात तणाव, इंटरनेट सेवा स्थगित
चकमकीनंतर शोपियां परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
कोणतीही अफवा पसरू नये म्हणून प्रशासनाने इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे.
🇮🇳 ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची कामगिरी
ही कारवाई ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाची ठरते. अलीकडेच भारताने पाकिस्तानला
जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, काश्मीरमध्ये अतिरेक्यांची हालचाल वाढू लागल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pakistancha-khotaradepana-ughad/