अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांचा लोंढा
धडकला आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.
ट्रॅक्टर मोर्चा आणि शेतकऱ्यांचा उद्रेक
या ट्रॅक्टर मोर्चात विदर्भातील सहा जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी झाले होते.
अकोल्यात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीजबिल माफ करणे,
हमीभाव लागू करणे, आणि सातबाऱ्यावरून कर्ज हटवणे अशा अनेक मागण्या मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार नितीन देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल
मोर्चादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
“फडणवीस यांनी निवडणुकीआधी कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण आजही शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही.”
“जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधानभवनावर धडक देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारवर वाढता दबाव
शिवसेना (ठाकरे गट) च्या या आंदोलनामुळे विदर्भातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस अंमलबजावणी हवी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyamage-hamasachan-naw-connection-ughd/