अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली
अकोट (प्रतिनिधी)
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)
यांच्यावतीने तालुकाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष
Related News
तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही
लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यां...
Continue reading
रोहित पवारांनी हेलिकॉप्टर मधून उतरून ग्राउंड लेव्हल वर येऊन काम करावं
असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
अजित पवार पक्षात एकाकी पडले असल्याचं राष...
Continue reading
गोरखपूरच्या सहजनवा पोलीस ठाण्याच्या बाहिलपार गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.
अंगद शर्मा नावाच्या पतीने आपल्या पत्नी नेहा हिचा गळा चिरून खून केला आणि सुमारे एक
तास तिच्या मृतदेहाज...
Continue reading
उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूर दरम्यानचा प्रवास आता फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
लखनऊ विकास प्राधिकरण (LDA) ने या महत्त्वाकांक्षी रॅपिड रेल प्रकल्पासाठी
...
Continue reading
गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,
परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीने
लोकांना जियो सिम घ...
Continue reading
उत्तराखंड: राज्यात प्री-मान्सूनच्या पावसाने वातावरणात बदल जाणवू लागला असून,
आज (४ जून) हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
देहरादून, टिहरी, हरिद्वार आणि पौडी...
Continue reading
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना संलग्न संघर्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी
कामगार तथा मजूर युनियन च्या राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदी संगीता जाधव महाराष्ट्...
Continue reading
गावालगतच्या शिवाजी नगर शेतशिवारातील गोठ्यावर काल रात्री अचानक झालेल्या
हल्ल्यात तीन बकर्या व दोन वासरांचा मृत्यू झाला. ही घटना विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ
...
Continue reading
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अकोल्यात कोरोनाचा शिरगाव झाला आहेय.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचे दोन रुग्ण आढलून आलेय.
या दोन्ही रुग्ण...
Continue reading
IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) अखेर 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर
पहिला किताब जिंकला आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि विनोदांचा पूर आला.
या मध्...
Continue reading
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे निघालेली संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच
आज पहाटेच अकोला शहरात आगमन झाले.." श्री"ची पालखी ही दोन दिवस अकोला शहरात मुक्कामी राहणार आहे.
...
Continue reading
अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर येथे रात्री झालेल्या वादातून 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनु...
Continue reading
श्रीयश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणुकीत आश्वासने, प्रत्यक्षात शून्य कर्जमाफी!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,
अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांकडून कर्जफेडीचा दबाव टाकण्यात येत
असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडले आहेत, असेही नमूद करण्यात आले.
नुकसानीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर
निरंतर नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढते उत्पादन खर्च आणि बँकांचे दडपण यामुळे
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.
“शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असून, अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत,”
अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कायद्याने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करा – राष्ट्रवादी काँग्रेस
शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झाले आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी,
अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
या निवेदनप्रसंगी जिल्हा बुथ कमिटी प्रमुख कैलास गोंडचर, तालुकाध्यक्ष श्रीयश चौधरी, सिकंदर मर्दाने,
माजी नगरसेवक विवेक बोचे, कृ.उ.बा.सं. संचालक धीरज हिंगणकर, तसेच अविनाश जायले,
अंकुश चौधरी, रोशन कंकाळे, आश्विन चौधरी, राम देशमुख, हनुमंत चौधरी, मंगळे, अब्रक शेख,
अजीत शेख, अलीम शहा, आकाश चव्हाण, योगेश इंगोले, प्रमोद लहाने, गजानन पडोळे,
कैलास कोटकर, नरेंद्र कोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.