अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली
अकोट (प्रतिनिधी)
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)
यांच्यावतीने तालुकाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष
Related News
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — मुर्तीजापुर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या
घटनांनी नागरिकांना अक्षरशः हैराण करून टाकले आहे. मात्र आता या चोरीच्या
सत्राला लगाम ...
Continue reading
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कधी निसर्ग साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो – परिणामी उत्पन्नात घट होते.
पण अकोल्याच्या दिग्रस गावातील एका ...
Continue reading
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ...
Continue reading
श्रीयश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणुकीत आश्वासने, प्रत्यक्षात शून्य कर्जमाफी!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,
अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांकडून कर्जफेडीचा दबाव टाकण्यात येत
असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडले आहेत, असेही नमूद करण्यात आले.
नुकसानीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर
निरंतर नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढते उत्पादन खर्च आणि बँकांचे दडपण यामुळे
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.
“शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असून, अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत,”
अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कायद्याने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करा – राष्ट्रवादी काँग्रेस
शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झाले आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी,
अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
या निवेदनप्रसंगी जिल्हा बुथ कमिटी प्रमुख कैलास गोंडचर, तालुकाध्यक्ष श्रीयश चौधरी, सिकंदर मर्दाने,
माजी नगरसेवक विवेक बोचे, कृ.उ.बा.सं. संचालक धीरज हिंगणकर, तसेच अविनाश जायले,
अंकुश चौधरी, रोशन कंकाळे, आश्विन चौधरी, राम देशमुख, हनुमंत चौधरी, मंगळे, अब्रक शेख,
अजीत शेख, अलीम शहा, आकाश चव्हाण, योगेश इंगोले, प्रमोद लहाने, गजानन पडोळे,
कैलास कोटकर, नरेंद्र कोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.