बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत
आपल्याच देशातून पलायन केलं आहे. हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासात
काल काही आंदोलकांनी प्रवेश करत तोडफोड केली.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे हसीना शेख यांना अखेर काल देश सोडावा लागला.
शेख हसीना आपल्या विशेष हेलिकॉप्टरने भारताच्या दिशेला रवाना झाल्या.
शेख हसीना यांच्यावर ओढावलेल्या या संकट काळात भारताने त्याने आश्रय दिला आहे.
त्यांचं हेलिकॉप्टर बांगलादेश येथून निघाल्यानंतर भारताच्या उत्तर प्रदेशमधील
हिंडन एअरबसवर लँड झालं. त्या भारतात फार वेळ थांबणार नाहीत.
त्या लवकरच युरोपच्या दिशेला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शेख हसीना या लंडनला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पुढचा निर्णय घेतलेला नाही.
त्यांनी भारताकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही.
त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत मागितली तर भारत सरकार त्यावर विचार करेल.
बांगलादेशमधील परिस्थितीवर भारत अलर्ट मोडवर आहे.
विशेष म्हणजे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/death-toll-in-keralas-wayanad-reaches-402/